भोपाळ: भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची तब्येत अचानक बिघडल्याचे वृत्त आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. प्रज्ञासिंह यांना अचानक चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यानंतर लोकांनी त्यांना उचलून खुर्चीत बसवले. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले.
३० मे या दिवशी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या हरवल्या आहेत अशा आशयाचे फलक भोपाळमध्ये लावण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, अर्थात ३१ मे या दिवशी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. आजारी असल्याने त्या गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. आपली तब्येत ठीक नसल्याचे त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे म्हटले होते. त्यांना एका डोळ्याने व्यवस्थित दिसत नसल्याची त्यांची तक्रार होती. दुसऱ्या डोळ्यांनीही त्यांना स्पष्ट दिसत नसल्याची त्यांची तक्रार होती. त्यांच्या मेंदूपासून ते डोळ्याच्या पडद्यापर्यंतच्या भागाला सूज आल्याचेही म्हटले जात आहे. सध्या कुणाशी बातचीत करू नका, विश्रांती घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता.
डॉक्टरांनी साध्वींना दिला होता आरामाचा सल्ला
काँग्रेसचे नेते आपल्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवत असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले होते. मी आज ज्या समस्यांनी ग्रस्त आहे या सर्व समस्या काँग्रेसच्या सरकारांनी दिलेल्या आहेत, असे आरोप प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर केले होते. दरम्यान डॉक्टरांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आरामाचा सल्ला दिला होता. काँग्रेस सरकारच्या काळात प्रज्ञासिंह यांना अटक झाल्यानंतर त्यांचा खूप छळ करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांना आणि डोक्याला दुखावत झाली होती. म्हणूनच त्याना आता डोळ्यांचा त्रास होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांना कमरेचाही त्रास झाला होता.
श्यामा प्रसाद मुखर्जींचे ते स्वप्न पू्र्ण झाले- शिवराजसिंह चौहान
श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोपाळमध्ये एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे शुभारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी झाले. जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्याने श्यामा प्रसाद मुखर्जींचे स्वप्न पूर्ण झाले असे ते म्हणाले आता मुखर्जी यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वावलंबी भारताची देखील निर्मिती होईल असेही चौहान म्हणाले.
३० मे या दिवशी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या हरवल्या आहेत अशा आशयाचे फलक भोपाळमध्ये लावण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, अर्थात ३१ मे या दिवशी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. आजारी असल्याने त्या गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. आपली तब्येत ठीक नसल्याचे त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे म्हटले होते. त्यांना एका डोळ्याने व्यवस्थित दिसत नसल्याची त्यांची तक्रार होती. दुसऱ्या डोळ्यांनीही त्यांना स्पष्ट दिसत नसल्याची त्यांची तक्रार होती. त्यांच्या मेंदूपासून ते डोळ्याच्या पडद्यापर्यंतच्या भागाला सूज आल्याचेही म्हटले जात आहे. सध्या कुणाशी बातचीत करू नका, विश्रांती घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता.
डॉक्टरांनी साध्वींना दिला होता आरामाचा सल्ला
काँग्रेसचे नेते आपल्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवत असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले होते. मी आज ज्या समस्यांनी ग्रस्त आहे या सर्व समस्या काँग्रेसच्या सरकारांनी दिलेल्या आहेत, असे आरोप प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर केले होते. दरम्यान डॉक्टरांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आरामाचा सल्ला दिला होता. काँग्रेस सरकारच्या काळात प्रज्ञासिंह यांना अटक झाल्यानंतर त्यांचा खूप छळ करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांना आणि डोक्याला दुखावत झाली होती. म्हणूनच त्याना आता डोळ्यांचा त्रास होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांना कमरेचाही त्रास झाला होता.
श्यामा प्रसाद मुखर्जींचे ते स्वप्न पू्र्ण झाले- शिवराजसिंह चौहान
श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोपाळमध्ये एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे शुभारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी झाले. जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्याने श्यामा प्रसाद मुखर्जींचे स्वप्न पूर्ण झाले असे ते म्हणाले आता मुखर्जी यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वावलंबी भारताची देखील निर्मिती होईल असेही चौहान म्हणाले.