नोएडा
राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उत्तर प्रदेश सरकारला एक जबरदस्त धक्का बसला आहे. योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने राज्यातील प्रस्तावित पतंजली फूड पार्क अन्य ठिकाणी हलवण्याची तयार सुरू केली आहे.
पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि पतंजली योगपीठाचे सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. ग्रेटर नोएडामधील प्रस्तावित मेगा फूड पार्क अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय पतंजलीनं घेतला आहे. श्रीराम व कृष्ण यांच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा संकल्प राज्य सरकारच्या उदासीसनतेमुळे अपूर्णच राहणार आहे, असं आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वृत्ती चांगली नाही. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हं दिसत नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून अन्य ठिकाणी हा प्रकल्प हलवण्याचा निर्णय पतंजलीनं घेतल्याचं ट्विटमध्ये म्हटलंय.
२०१६ साली मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नोएडामध्ये यमुना एक्स्प्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरणामध्ये पतंजली फूड पार्कचे भूमिपूजन केले होते. फूड पार्क सुरू झाल्यानंतर राज्यातील जवळपास १० हजार लोकांना याठिकाणी नोकरी मिळेल असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. या प्रोजेक्टमध्ये पतंजली ग्रुप १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. परंतु, आता योगी सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प बारगळला आहे.
राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उत्तर प्रदेश सरकारला एक जबरदस्त धक्का बसला आहे. योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने राज्यातील प्रस्तावित पतंजली फूड पार्क अन्य ठिकाणी हलवण्याची तयार सुरू केली आहे.
पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि पतंजली योगपीठाचे सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. ग्रेटर नोएडामधील प्रस्तावित मेगा फूड पार्क अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय पतंजलीनं घेतला आहे. श्रीराम व कृष्ण यांच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा संकल्प राज्य सरकारच्या उदासीसनतेमुळे अपूर्णच राहणार आहे, असं आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वृत्ती चांगली नाही. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हं दिसत नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून अन्य ठिकाणी हा प्रकल्प हलवण्याचा निर्णय पतंजलीनं घेतल्याचं ट्विटमध्ये म्हटलंय.
२०१६ साली मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नोएडामध्ये यमुना एक्स्प्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरणामध्ये पतंजली फूड पार्कचे भूमिपूजन केले होते. फूड पार्क सुरू झाल्यानंतर राज्यातील जवळपास १० हजार लोकांना याठिकाणी नोकरी मिळेल असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. या प्रोजेक्टमध्ये पतंजली ग्रुप १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. परंतु, आता योगी सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प बारगळला आहे.