अ‍ॅपशहर

येथे मुडदे स्मशानभूमीतून येऊन करतात रोजगार हमीची कामे

Gujarat Latest News: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) गुजरातमध्ये एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात मृत्मयू पावलेल्या लोकांना काम करताना दाखवले आहे. या बरोबरच या लोकांची मजुरी देखील त्यांच्या नावे उघडण्यात आलेल्या खात्यातून काढण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2020, 7:09 pm
अहमदाबाद: महात्मा गाधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात मेलेल्या लोकांना रोजगार हमीची काम करताना दाखवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त या मेलेल्या व्यक्तींना मिळालेली मजुरी देखील त्यांच्या बँक खात्यातून काढण्यात आले आहेत. हे प्रकरण बनासकांठा येथील बलुंदरा गावातील आहे. येथे गावातील एकूण ५ लोकांच्या मृत्यूनंतर त्यांना सन २०१६ आणि २०१९ या काळात मनरेगाच्या साइटवर काम करताना दाखवले गेले. त्यांच्या नावावर मिळालेली मजुरी देखील लंपास करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम येथे मुडदे स्मशानभूमीतून येऊन करतात रोजगार हमीची कामे


खरे तर स्थानिक कार्यकर्ते किरण परमार आणि वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी सुमारे २,६०० इतकी लोकसंख्या असलेल्या गुजरात-सीमेवर असलेले छोटे गाव बलुंदरा येथे सुमारे महिन्याभरापूर्वी मनरेगाअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या गावातील सुमारे ८०० लोकांना कोणतीही कल्पना न देताच त्यांच्या नावे बँक खाती उघडण्यात आली. या खात्यात मनरेगाच्या मजुरीचे पैसे भरता यावेत यासाठी ही खाती उघडण्यात आली होती, असा दावा जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे.

८०० लोकांच्या नावे बनवली डमी जॉब कार्ड

हे गाव आदिवासी गाव असून या गावात ८०० लोकांच्या नावावर बनावट जॉब कार्ड तयार करण्यात आले होते. यां पैकी ५ लोकांचा फार पूर्वी मृत्यू झालेला असून त्यांच्या नावापुढे सही करून त्यांची मजुरी घेतली जात होती असे पुढील चौकशीत स्पष्ट झाले होते. गरिबांच्या नावावर पैसे चोरी करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- आता सरकारी अधिकारी बनणार 'कर्मयोगी'; मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी
तीन वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या मुजुरांच्या नावावर २०२० पर्यंत काढले गेले पैसे

ज्या मृत व्यक्तींच्या नावावर मजुरीचे पैसे काढले जात होते, त्यांची नावे भीरा वसिया, जालमा घोराणा, हेमा घोराणा, काला घोराणा आणि वली श्रीमाळी अशी आहेत. नव्या मनरेगाच्या रेकॉर्डनुसार, मृत्यू पावलेल्या लोकांच्या नावावर दर आठवड्याला २०२० पर्यंत पैसे काढण्यात आले. या लोकोचा मृत्यू सन २०१६ आणि २०१९ दरम्यान झाला होता.

क्लिक करा आणि वाचा- देशात दररोज करोनाने मृत्यू अधिक होतात की, रस्ते अपघातामुळे?, पाहा!
क्लिक करा आणि वाचा- LAC face-off: तुमच्या सैनिकांना आवरा; भारताचा चीनला इशारा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज