पाटणाः लोकसभा निवडणुकीच्या दीर्घकालीन निवडणूक प्रक्रियेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आक्षेप घेतला आहे. लोकसभा निवडणुका कमीत कमी टप्प्यात पार पडाव्यात, असं मत नितीशकुमार यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बिहारमधील ८ जागांवर निवडणुका पार पडत आहे. पाटणा येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नितीशकुमार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकसभेची निवडणूक प्रक्रिया कमीत कमी टप्प्यांमध्ये पार पडायला हवी. मतदानाच्या दोन टप्प्यात बरेच अंतरही होते. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका उन्हाळ्यापेक्षा चांगल्या हवामानात घ्याव्यात, असा सल्ला नितीशकुमार यांनी यावेळी निवडणूक आयोगाला दिला.
मे महिन्यात मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा असतो. मतदान केंद्रांवर छताची व्यवस्था केली जात नाही. कडाक्याच्या उन्हात मतदारांना मतदान करावे लागते. लोकसभा निवडणुकांचे मतदान फेब्रुवारी-मार्च किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये व्हायला हवे. निवडणुका कमी टप्प्यात होण्यासाठी सर्व पक्षांना पत्र लिहिणार आहे, असे नितीशकुमार यांनी सांगितले.
जनतेची सेवा करणे आमचा धर्म आहे. गेल्या १३ वर्षांत बिहारसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रातील मोदी सरकारनेही चांगले काम केले असून, बिहारच्या विकासासाठी वेळोवेळी साहाय्य केले. आम्ही सर्वजण एनडीएत सहभागी आहोत. यंदाच्या निवडणुकांमध्ये एनडीए बाजी मारेल, असा विश्वास नितीशकुमार यांनी व्यक्त केला.
मे महिन्यात मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा असतो. मतदान केंद्रांवर छताची व्यवस्था केली जात नाही. कडाक्याच्या उन्हात मतदारांना मतदान करावे लागते. लोकसभा निवडणुकांचे मतदान फेब्रुवारी-मार्च किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये व्हायला हवे. निवडणुका कमी टप्प्यात होण्यासाठी सर्व पक्षांना पत्र लिहिणार आहे, असे नितीशकुमार यांनी सांगितले.
जनतेची सेवा करणे आमचा धर्म आहे. गेल्या १३ वर्षांत बिहारसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रातील मोदी सरकारनेही चांगले काम केले असून, बिहारच्या विकासासाठी वेळोवेळी साहाय्य केले. आम्ही सर्वजण एनडीएत सहभागी आहोत. यंदाच्या निवडणुकांमध्ये एनडीए बाजी मारेल, असा विश्वास नितीशकुमार यांनी व्यक्त केला.