अ‍ॅपशहर

नितीशकुमार 'तसं' म्हणालेच नाही, निकटवर्तीयांनी दिलं स्पष्टीकरण

बिहार विधानसभा निवणुडीचा प्रचार संपला. यापूर्वी एका सभेत बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीशकुमार यांनी मोठी घोषणा केली. आपली ही शेवटची निवडणूक आहे, असं ते म्हणाले. पण त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्टीकरण दिलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2020, 8:54 pm
पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकी ( bihar election ) आज प्रचार संपण्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar ) यांनी मोठी घोषणा केली. ही आपली शेवटची निवडणूक आहे, असं नितीशकुमार पूर्णियातील सभेत म्हणाले. पण पाटण्यात पोहोचता त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला आहे, असं म्हटलंय. ही शेवटचा निवडणूक नव्हे तर या निवडणुकीची शेवटची प्रचारसभा आहे असं त्यांचं म्हणणं होतं, असं नितीशकुमार यांचे निकटवर्तीय म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nitish Kumar
नितीशकुमार 'तसं' म्हणालेच नाही, निकटवर्तीयांनी दिलं स्पष्टीकरण


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर्णिया जिल्ह्यातील धमदाहामध्ये जेडीयूची प्रचारसभा घेतली. जेडीयूचे उमेदवार लेसी सिंह यांच्या प्रचारासाठी नितीशकुमार आले होते. ही आपली शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला. तुम्ही उमेदवार लेसी सिंह यांना प्रचंड मतांधिक्यानी विजय मिळवून देणार का?, असं नितीशकुमार या सभेत म्हणाले.

'आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला. यामुळे तुम्ही लेसी सिंह यांना विजयी कराल ना? त्यांच्या गळ्यात आताच विजयाची माळ घालू ना?', असं नितीशकुमार म्हणाले.

नितीशकुमार भावुक, म्हणाले, 'ही माझी शेवटची निवडणूक'

आपल्या नागरिकांना देशाबाहेर काढण्याची कोणात इतकी हिंमत नाहीए, असं नितीशकुमार किशनगंजमधील सभेत म्हणाले होते. त्यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. बांगलादेशी घुसखोरांची देशाबाहेर हाकालपट्टी करू, असं आदित्यनाथ प्रचारसभेत म्हणाले होते.

'बजेट माहित नाही, तरीही दिलं १० लाख नोकऱ्यांचं आश्वासन'

PM मोदींची बिहारच्या जनतेला पत्रातून साद; म्हणाले....

किशनगंज येथे मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी नितीशकुमार यांनी अल्पसंख्याकांच्या हितासाठी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. नितीशकुमार यांचा इशारा हा नागरिकत्व सुधारणा कायद्याकडे होता. सर्वांना सोबत घेऊन जाणं हाच आपला धर्म आहे. हीच आपली संस्कृती आहे. सगळे एकजूट होऊन सोबत चालले तर बिहारही पुढे जाईल, असं नितीशकुमार या सभेत म्हणाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज