अ‍ॅपशहर

'१० लाख नोकऱ्या कशा देणार, एवढा पैसा कुठून आणणार?'

बिहारमध्ये ऐन सणासुदीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला सुरुवात झाल्याने निवडणुकीत रंगत येत आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीशकुमार यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2020, 8:32 pm
पाटणाः गोपालगंजमधील जाहीर प्रचारसभेतून ( bihar election ) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar ) यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव ( tejashwi yadav )यांना लक्ष्य केलं. १० लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन जनतेला देत आहात. पण या नोकऱ्या कशा देणार, पैसा कुठून येईल हे सांगत नाही, असं नितीशकुमार म्हणाले. पती-पत्नीच्या १५ वर्षांच्या कारभार बिहारमधील जनता विसरलेली नाही. संध्याकाळ होताच नागरिक घरातच रहायाचे. आता बिहारमध्ये कायद्याचं राज्य स्थापित करण्यासाठी आम्ही काम केलं आहे, असं नितीशकुमार म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nitish Kumar tejashwi yadav
'१० लाख नोकऱ्या कशा देणार, एवढा पैसा कुठून आणणार?'


आपल्या सरकारने गेल्या १५ वर्षांत केलेल्या विविध विकासकमांची माहिती देत नितीशकुमार यांनी आरजेडी नेते लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्यावरही टीका केली. पती-पत्नीच्या कारभाराला कुणी विसरलेलं नाही. संध्याकाळ होताच नागरिक घराबाहेर पडालयाही घाबरत होते, असं नितीशकुमार म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. काही जण १० लाख नोकऱ्या देण्याचा दावा करत आहेत. पण यासाठी पैसा कुठून येणार हे मात्र ते सांगत नाहीत. ज्यासाठी तुरुंगात गेले तो पैसा काढून तुम्ही नोकऱ्या देणार का?, असा सवाल करत नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला.

बिहारमध्ये यापूर्वी महिलांचा आदर केल जात नव्हता. आम्ही पंचायत आणि नगरपालिकांमध्ये त्यांच्यासाठी ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. पूर्वी महादलितांची मुलं मोठ्या शाळेत जाऊ शकत नव्हती. आता शाळाबाह्य मुलांची संख्याही अर्ध्या टक्क्यावर आहे. शाळांमध्ये मुलं आणि मुलींची संख्या जवळपास एकसारखी झाली आहे, असं नितीश कुमार म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात चीनवर बोलावं, राहुल गांधींचे आव्हान

'करोनावरील उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही, बंदी घालण्याचा विचार'

रुग्णालयेही खूप सुधारली आहेत. पूर्वी, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, दरमहा फक्त ३९ नागरिक उपचारांसाठी जात होते. पण आता एका महिन्यात सरासरी १०,००० नागरिक उपचारांसाठी जातात. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, महिला आयटीआय आणि एएनएम संस्था प्रत्येक जिल्ह्यात उघडल्या जात आहेत. गरीबांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी चार लाख रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज