अ‍ॅपशहर

'जंगलराज इतिहासजमा, आता मुद्दा रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाचा'

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जोरदार टीका केली आहे. अनुभवी असूनही ते अनुभवी नसल्यासारखे बोलत आहेत. जंगलराजचा काळ गेला आता आरोग्य, शिक्षणाचे मुद्दे आहेत, असं तेजस्वी यादव म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Nov 2020, 12:13 am
नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ( bihar election ) दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. मतदानाचा दुसरा टप्पा संपल्यानंतर आरजेडीचे नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव ( tejashwi yadav ) यांनी भूमिका मांडली. यावेळी तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांवर ( nitish kumar) हल्ला केला. नितीशकुमार मुद्द्यांवर बोलत नाहीत. आपण सध्या वर्तमानात जगतोय. पण नितीशकुमार जंगलराजवर जे काही बोलत आहेत ते त्यांनी बोलावं. मात्र, आम्ही रोजगार, आरोग्य, शिक्षण या मुद्द्यांवर पुढे जात आहोत, असं तेजस्वी यादव म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Tejashwi Yadav
'जंगलराज इतिहासजमा, आता मुद्दा रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाचा'


बिहारमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जनता नितीशकुमारांचा द्वेष करू लागली आहे. नागरिकांना उत्पन्न आणि रोजगार हवा आहे, असं म्हणत तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानांनाही लक्ष्य केलं. बिहारमध्ये पूर आला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी दुर्लक्ष केलं. तेव्हा कोणीही बघायला आलं नाही. त्यांनी बिहारला काय दिलं? त्यांचं योगदान काय आहे? त्यांनी कोणतं काम केलं ज्यावर ते मतदान मागत आहेत, असं तेजस्वी यादव म्हणाले.

बिहारची जनता आम्हाला साथ देईल, असा माझा विश्वास आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि बिहार प्रीमियर लीगमध्ये ( विधानसभा निवडणूक ) एक गोष्ट सामान्य आहे. ते म्हणजे करोना काळात दोन्ही सुरू आहेत. करोनामध्ये डबल इंजिन सरकारने काय केलं हे सर्वांनी पाहिले आहे. ४० गाड्या चुकीच्या मार्गावर गेल्या. मजुरांची काय अवस्था होती, हे या डबल इंजिन सरकारने दाखवून दिले आहे. विशेष पॅकेजचे काय झाले?, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला.

बिहारमध्ये ५४ टक्क्यांहून अधिक, तर मध्य प्रदेशात ६९ टक्क्यांवर मतदान

'भारत माता की जय' बोलल्याने काहींना ताप येतोः PM मोदी

नितीशकुमार थकले आहेत. ते मुद्द्यांवर काहीच बोलत नाहीत. ते नसलेल्या मुद्द्यांविषयी बोलतात. बिहारचे नागरिक का बाहेर जात आहे यावर ते का बोलत नाहीत? नितीशकुमार हे सर्वांत अनुभवी मुख्यमंत्री आहेत. पण ते अनुभव नसल्यासारखे बोलतात. करोना काळात ते घरात बसून होते. आता ते बाहेर का आले आहेत?, असं तेजस्वी यादव म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज