पाटणा / नवी दिल्ली : बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षात उभी फूट पडलीय. दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पासवान यांचा मुलगा चिराग पासवान आणि खासदार पशुपती कुमार पारस यांच्यातील मतभेद खुलेपणाने उघड झालेत.
पशुपती कुमार यांची लोकसभेतील पक्ष नेतेपदी निवड चिरागचे काका पशुपती कुमार पारस यांच्यासहीत पक्षातील पाच खासदारांनी बंडखोरी केलीय. यामध्ये पक्षाचे बिहार प्रदेशाध्यक्ष प्रिन्स राज यांचाही समावेश आहे. लोजपच्या पाच बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली.
याच दरम्यान खासदार पशुपती कुमार पारस यांची आज सर्वसंमतीनं लोकसभेतील पक्षनेते म्हणून निवड करण्यात आलीय. आज पार पडलेल्या पक्षातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अगोदर, आज सकाळी चिराग पासवान यांनी आपले काका पशुपती पारस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
'मी पक्ष तोडला नाही तर वाचवला'
'संसदेत लोजपचे एकूण सहा खासदार आहेत. त्यापैंकी पाच खासदारांनी पक्षाच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित करत चिंता व्यक्त केली. त्यामुळे पक्षाला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. मी पक्ष तोडला नाही. चिराग पासवान यांच्याशी वैयक्तिकरित्या कोणतीही तक्रार किंवा आक्षेप नाही. त्यांनीही पक्षात रहावं', अशी प्रतिक्रिया पशुपती कुमार पारस यांनी व्यक्त केली.
'एनडीएसोबत राहण्याची कार्यकर्त्यांची इच्छा'
गेल्या बिहार निवडणुकीत लोजपनं २०१४ प्रमाणेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) भाग म्हणून निवडणुकीत सहभागी व्हावं, अशी पक्षाच्या ९९ टक्के कार्यकर्ते, खासदार, आमदार आणि समर्थकांची इच्छा होती. मात्र, असं होऊ शकलं नाही, त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचंही पशुपती पारस यांनी म्हटलंय.
नितीन कुमार यांचं कौतुक
चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या पशुपती पारस यांनी एका पत्रकार परिषदेत आपलं म्हणणं मांडलं. यावेळी त्यांनी उघडपणे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं कौतुक केलं. पशुपती पारस हे बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून लोक जनशक्ती पक्षाचे खासदार आहेत. 'लोक जनशक्ती हा आमचा पक्ष आहे. बिहारमध्ये आम्ही मजबूत स्थितीत आहोत आणि यापुढेही आम्ही एनडीएचाच एक भाग असू. नितीश कुमार हे चांगले नेते आहेत' असंही वक्तव्य पारस यांनी यावेळी केलं.
नितीश कुमार यांचं 'ऑपरेशन चिराग'
खासदारांच्या बंडखोरीमुळे पक्षात चिराग पासवान एकाकी पडलेत. लोक जनशक्ती पक्षात उभी फूट पाडून मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतील अपमानाचा सूड घेतल्याची प्रतिक्रियाही राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येतेय. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर पहिल्या क्रमांकावर राष्ट्रीय जनता दल आणि दुसऱ्या क्रमांकावर भाजप आपले आमदार निवडून आणण्यात यशस्वी ठरले होते.
पशुपती कुमार यांची लोकसभेतील पक्ष नेतेपदी निवड
याच दरम्यान खासदार पशुपती कुमार पारस यांची आज सर्वसंमतीनं लोकसभेतील पक्षनेते म्हणून निवड करण्यात आलीय. आज पार पडलेल्या पक्षातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अगोदर, आज सकाळी चिराग पासवान यांनी आपले काका पशुपती पारस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
'मी पक्ष तोडला नाही तर वाचवला'
'संसदेत लोजपचे एकूण सहा खासदार आहेत. त्यापैंकी पाच खासदारांनी पक्षाच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित करत चिंता व्यक्त केली. त्यामुळे पक्षाला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. मी पक्ष तोडला नाही. चिराग पासवान यांच्याशी वैयक्तिकरित्या कोणतीही तक्रार किंवा आक्षेप नाही. त्यांनीही पक्षात रहावं', अशी प्रतिक्रिया पशुपती कुमार पारस यांनी व्यक्त केली.
'एनडीएसोबत राहण्याची कार्यकर्त्यांची इच्छा'
गेल्या बिहार निवडणुकीत लोजपनं २०१४ प्रमाणेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) भाग म्हणून निवडणुकीत सहभागी व्हावं, अशी पक्षाच्या ९९ टक्के कार्यकर्ते, खासदार, आमदार आणि समर्थकांची इच्छा होती. मात्र, असं होऊ शकलं नाही, त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचंही पशुपती पारस यांनी म्हटलंय.
नितीन कुमार यांचं कौतुक
चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या पशुपती पारस यांनी एका पत्रकार परिषदेत आपलं म्हणणं मांडलं. यावेळी त्यांनी उघडपणे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं कौतुक केलं. पशुपती पारस हे बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून लोक जनशक्ती पक्षाचे खासदार आहेत. 'लोक जनशक्ती हा आमचा पक्ष आहे. बिहारमध्ये आम्ही मजबूत स्थितीत आहोत आणि यापुढेही आम्ही एनडीएचाच एक भाग असू. नितीश कुमार हे चांगले नेते आहेत' असंही वक्तव्य पारस यांनी यावेळी केलं.
नितीश कुमार यांचं 'ऑपरेशन चिराग'
खासदारांच्या बंडखोरीमुळे पक्षात चिराग पासवान एकाकी पडलेत. लोक जनशक्ती पक्षात उभी फूट पाडून मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतील अपमानाचा सूड घेतल्याची प्रतिक्रियाही राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येतेय. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर पहिल्या क्रमांकावर राष्ट्रीय जनता दल आणि दुसऱ्या क्रमांकावर भाजप आपले आमदार निवडून आणण्यात यशस्वी ठरले होते.