पाटणा: बिहारमध्ये नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. जेडीयूचे नितीश कुमार आणि आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी राजभवन गाठून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आता या महाआघाडीचा शपथविधी सोहळा उद्या म्हणजेच बुधवार १० ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पाटणा येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नव्या सरकारला १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. बिहारमध्ये आज दिवसभर राजकीय गोंधळाचे वातावरण होते. एनडीएपासून फारकत घेत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. जोपर्यंत एकत्र राहिलो तोपर्यंत युतीचा धर्म पाळल्याचे नितीश कुमार म्हणाले. आमदार-खासदारांच्या संमतीनंतर आम्ही निर्णय घेतला. आपण एनडीएच्या आघाडीतून दूर व्हावं, अशी सर्व नेत्यांची इच्छा होती. भाजपने जेडीयूला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपने नेहमीच त्यांचा अपमान केला, असंही नितीश कुमार म्हणाले.
हेही वाचा -Bihar Politics: बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! नितीश कुमारांना सीएम पद; तेजस्वींचं 'पवार स्टाईल' राजकारण
जेडीयू आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी ही खंत व्यक्त केली. बैठकीत नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांना सांगितले की, भाजपने नेहमीच त्यांचा अपमान केला. जेडीयूला संपवण्याचे षडयंत्र रचले गेले. भाजपने आमचे आमदार विकत घेण्याची तयारी केली होती.
दुसरीकडे, नितीश यांनी नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. राज्यपालांनी नितीश यांना शपथविधी सोहळ्यासाठी वेळही दिला आहे. नवीन सरकारचा शपथविधी १० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.
हेही वाचा -फक्त बिहारच नाही तर नितीशकुमारांचा आहे हा मोठा प्लॅन, पाटण्यात लागले पोस्टर
नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जेडीयू, आरजेडी, काँग्रेससह ७ पक्षांचे आघाडी सरकार स्थापन होणार आहे. तेजस्वी यादवही उद्या शपथ घेणार आहेत. मंत्र्यांची यादीही तयार करण्यात आल्याची माहिती आहे. यासोबतच मंत्रालयाचे विभाजनही जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा -Bihar Politics: बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! नितीश कुमारांना सीएम पद; तेजस्वींचं 'पवार स्टाईल' राजकारण
जेडीयू आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी ही खंत व्यक्त केली. बैठकीत नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांना सांगितले की, भाजपने नेहमीच त्यांचा अपमान केला. जेडीयूला संपवण्याचे षडयंत्र रचले गेले. भाजपने आमचे आमदार विकत घेण्याची तयारी केली होती.
दुसरीकडे, नितीश यांनी नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. राज्यपालांनी नितीश यांना शपथविधी सोहळ्यासाठी वेळही दिला आहे. नवीन सरकारचा शपथविधी १० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.
हेही वाचा -फक्त बिहारच नाही तर नितीशकुमारांचा आहे हा मोठा प्लॅन, पाटण्यात लागले पोस्टर
नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जेडीयू, आरजेडी, काँग्रेससह ७ पक्षांचे आघाडी सरकार स्थापन होणार आहे. तेजस्वी यादवही उद्या शपथ घेणार आहेत. मंत्र्यांची यादीही तयार करण्यात आल्याची माहिती आहे. यासोबतच मंत्रालयाचे विभाजनही जवळपास निश्चित झाले आहे.