अ‍ॅपशहर

राहुल, भूकंप कराच; भाजपचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपने उघड आव्हान दिले आहे. राहुल यांच्या कथित गौप्यस्फोटाने संसदेत भूकंप येणार नाही उलट राहुल यांच्याच पायाखालची वाळू सरकेल, असा टोलाच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगावला आहे.

Maharashtra Times 14 Dec 2016, 6:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp aap ask why rahul gandhi isnt revealing what the damaging info is that he has on pm
राहुल, भूकंप कराच; भाजपचे आव्हान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपने उघड आव्हान दिले आहे. राहुल यांच्या कथित गौप्यस्फोटाने संसदेत भूकंप येणार नाही उलट राहुल यांच्याच पायाखालची वाळू सरकेल, असा टोलाच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगावला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मोदींविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर ते संसदेबाहेर जाहीर का करत नाही, असा सवाल राहुल यांना केला आहे.

प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल यांच्यावर पलटवार केला. विरोधी पक्ष विनाअट चर्चा करायला तयार आहे, असं जर राहुल म्हणत असतील तर ते खोटं आहे. मुळात काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बसपाचे सदस्यच सभागृहात गोंधळ घालत आहेत. दररोज संसदेच्या कामकाजात अडथळे आणले जात आहेत. काही सदस्यांना संसदेत बोलायचं असतं पण या गोंधळामुळे ते बोलू शकत नाहीत, असे जावडेकर म्हणाले. संसदेतील पंतप्रधानांच्या गैरहजेरीवर होणाऱ्या टीकेलाही जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्ष उद्या म्हणेल, पंतप्रधानांनी एकाचवेळी राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी उपस्थित राहावं, तर ते शक्य नाही. पंतप्रधानांना होलोग्रामने दोन्ही ठिकाणी दाखवावं का?, असा सवालच जावडेकर यांनी केला.


If Rahul Gandhi actually has papers on Modi ji's personal involvement in corruption, then why doesn't he expose it outside Parl? https://t.co/5xc2WkCd5B — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 14, 2016
केजरीवाल यांचाही सवाल

पंतप्रधान मोदी यांचा भ्रष्टाचारात हात असल्याचे पुरावे खरंच राहुल यांच्याकडे असतील तर ते संसदेत बोलण्याची प्रतीक्षा का करत आहेत?, हे पुरावे ते जाहीर का करत नाहीत?, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

कोण काय म्हणालं?

राहुल यांचे आरोप निराधार आणि निखालस खोटे आहेत. त्यांनी वैफल्यातून हे विधान केले आहे. त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला हवी - अनंत कुमार, केंद्रीय मंत्री

राहुल आणि काँग्रेस यांच्यामुळे संसदेचं कामकाज ठप्प आहे. असं ते का वागत आहेत?, याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं. नोटाबंदीवर संसदेत चर्चा व्हावी असे आम्हालाही वाटत आहे - व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री

राहुल यांच्याकडे पंतप्रधानांविरोधात पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे दाखवायला हवेत. केवळ आरोप करून चालणार नाही. संसदेत बोलू दिलं जात नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांच्यासाठी कोर्टाचे दरवाजेही खुले आहेत - सुब्रमण्यम स्वामी, भाजप नेते

राहुल यांनी त्यांच्याकडील पुरावे जाहीर करायला हवेत. मोदी राहुल यांना घाबरतात असं कुणी म्हणत असेल तर तो सर्वात मोठा विनोद आहे - कैलास विजयवर्गीय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज