मटा ऑनलाइन वृत्त । गुवाहाटी
ईशान्य भारतातील सर्वात मोठं राज्य असलेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं प्रथमच जोरदार मुसंडी मारली आहे. मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपप्रणित आघाडीनं स्पष्ट बहुमताकडं वाटचाल सुरू केली आहे.
प. बंगालसह पाच राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. आसामचाही त्यात समावेश असून येथील विधानसभेच्या १२६ पैकी ११६ जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी भाजप, आसाम गण परिषद व बोडो पीपल्स फ्रंट ही युती तब्बल ७३ जागांवर आघाडीवर आहे. तर, १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळ २४ जागांवर पुढं आहे. मुस्लिम मतांचे राजकारण करणाऱ्या बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटची (एआययुडीएफ) १५ जागांवर सरशी झाली आहे. इतर ५ जागांवर पुढं आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये काँग्रेसला ७८ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला अवघ्या पाच जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र सगळी समीकरणं उलटीपालटी झाली आहेत. भाजप आघाडीची सत्ता आल्यास आधीच ठरल्याप्रमाणे सर्वानंद सोनोवाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे.
ईशान्येकडील राज्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं काम असून या राज्यांच्या विकासाला भाजपनं नेहमीच प्राधान्य दिलं आहे. मोदी सरकारनं ईशान्य भारतासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र खातंही निर्माण केलं आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आसाममधील भाजपचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.
ईशान्य भारतातील सर्वात मोठं राज्य असलेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं प्रथमच जोरदार मुसंडी मारली आहे. मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपप्रणित आघाडीनं स्पष्ट बहुमताकडं वाटचाल सुरू केली आहे.
प. बंगालसह पाच राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. आसामचाही त्यात समावेश असून येथील विधानसभेच्या १२६ पैकी ११६ जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी भाजप, आसाम गण परिषद व बोडो पीपल्स फ्रंट ही युती तब्बल ७३ जागांवर आघाडीवर आहे. तर, १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळ २४ जागांवर पुढं आहे. मुस्लिम मतांचे राजकारण करणाऱ्या बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटची (एआययुडीएफ) १५ जागांवर सरशी झाली आहे. इतर ५ जागांवर पुढं आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये काँग्रेसला ७८ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला अवघ्या पाच जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र सगळी समीकरणं उलटीपालटी झाली आहेत. भाजप आघाडीची सत्ता आल्यास आधीच ठरल्याप्रमाणे सर्वानंद सोनोवाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे.
ईशान्येकडील राज्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं काम असून या राज्यांच्या विकासाला भाजपनं नेहमीच प्राधान्य दिलं आहे. मोदी सरकारनं ईशान्य भारतासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र खातंही निर्माण केलं आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आसाममधील भाजपचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.