अ‍ॅपशहर

ओबीसी दुखावल्यानेच भाजपचा पराभव

'भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रिपद न दिल्याने मागासवर्गीय समाज दुखावला आहे. मौर्य यांच्या नावानेच विधानसभा निवडणूक लढविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.

PTI 5 Jun 2018, 1:48 pm
बलिया (उत्तर प्रदेश) : 'भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रिपद न दिल्याने मागासवर्गीय समाज दुखावला आहे. मौर्य यांच्या नावानेच विधानसभा निवडणूक लढविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यामुळे मागासवर्गीय समाज संतापला असून, त्याचेच रुपांतर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होण्यात झाले, ' असे विधान उत्तर प्रदेशातील मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp


या पराभवाला योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत का, असे विचारता राजभर यांनी 'सरकार जबाबदार आहे' असे उत्तर दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज