अ‍ॅपशहर

मणिपूरमध्ये भाजपनं ओलांडला बहुमताचा आकडा

मणिपूर विधानसभा निवडणुकीत २८ जागा पटकावून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलेल्या काँग्रेसला चकवा देत भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्षांसह एक अपक्ष मिळून भाजपनं तब्बल ३२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रच राज्यपालांना सादर केलं आहे.

Maharashtra Times 13 Mar 2017, 9:51 am
मटा ऑनलाइन वृत्त । इम्फाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp crosses magic mark in manipur
मणिपूरमध्ये भाजपनं ओलांडला बहुमताचा आकडा


मणिपूर विधानसभा निवडणुकीत २८ जागा पटकावून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलेल्या काँग्रेसला चकवा देत भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्षांसह एक अपक्ष मिळून भाजपनं तब्बल ३२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रच राज्यपालांना सादर केलं आहे.

मावळत्या विधानसभेत एकही आमदार नसलेल्या भाजपचे मणिपूरमध्ये २१ आमदार निवडून आले आहेत. प्रत्येकी चार जागा जिंकणाऱ्या नागा पीपल्स फ्रंट व नॅशनल पीपल्स पार्टीनं भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर लोकजनशक्ती पक्ष, तृणमूल काँग्रेस व एका अपक्षानंही भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळं भाजपचं संख्याबळ ३२वर पोहोचलं आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठताच भाजपनं वेळ न दवडता राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

मावळते मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून सरकार स्थापनेसाठी आम्हालाच आधी निमंत्रण मिळाले पाहिजे,' असं इबोबी सिंग यांचं म्हणणं आहे. मात्र, भाजपनं लेखी पत्रच दिल्यानं काँग्रेसची गोची झाली आहे. राज्यपाल आता नेमकी कोणाला संधी देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज