अ‍ॅपशहर

GSTसाठी काहीही; शेतकऱ्यांसाठी १ मिनिटही नाही!

केंद्रातील भाजप सरकारला गरीब, शेतकरी आणि दलित जनतेची जराही काळजी नाही. हे सरकार जीएसटीसाठी मध्यरात्री संसद उघडू शकतं मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी एक मिनिटही देऊ शकत नाही. हेच या सरकारचे खरे रूप आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज 'शेतकरी आक्रोश मेळाव्या'त मोदी सरकारवर निशाणा साधला.

Maharashtra Times 19 Jul 2017, 6:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बांसवाडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp doesnt care about poor farmers dalits says rahul gandhi in rajasthan
GSTसाठी काहीही; शेतकऱ्यांसाठी १ मिनिटही नाही!


केंद्रातील भाजप सरकारला गरीब, शेतकरी आणि दलित जनतेची जराही काळजी नाही. हे सरकार जीएसटीसाठी मध्यरात्री संसद उघडू शकतं मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी एक मिनिटही देऊ शकत नाही. हेच या सरकारचे खरे रूप आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज 'शेतकरी आक्रोश मेळाव्या'त मोदी सरकारवर निशाणा साधला.

'मी आज सकाळी लोकसभेत होतो. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी वेळ मागितला होता. लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, असे आम्हाला वाटत होते. तुमच्या व्यथा तिथे मांडल्या जाणार होत्या. मात्र आम्हाला वेळ देण्यात आला नाही. आम्ही चर्चेसाठी दोन-तीन तास नाही तर केवळ १०-१५ मिनिटे मागितली होती. तितका वेळही दिला गेला नाही. यावरून या सरकारची नियत लक्षात येते, असे राहुल म्हणाले.

या सरकारला फक्त श्रीमंत उद्योगपतींची काळजी आहे. म्हणूनच जीएसटी लागू करण्यासाठी आणखी ३-४ महिने थांबायला हवे, ही आमची सूचना ऐकण्यात आली नाही, असे नमूद करताना सरकारच्या निर्णयाने छोटा उद्योजक भरडला गेला आहे, गरीब जनता त्रस्त आहे, असे राहुल यांनी सांगितले. जीएसटी म्हणजे गरीब आणि छोट्या उद्योजकांवर लादण्यात आलेला कर, अशी व्याख्याही राहुल यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज