मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा थेट फायदा भाजपला होणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यादव यांच्यातील तणावामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत 'सपा'ला मोठा फटका बसण्याची शक्यता एका सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात पक्षाची प्रतिमा खराब झाली असली तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून अखिलेश यांनाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
एबीपी न्यूज आणि सिरोस यांनी २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पाच विधानसभा मतदारसंघात सर्व्हे घेतला. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या पैकी ३९ टक्के लोकांच्या मते 'सपा'मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा भाजपला होईल असे वाटते. तर त्यापाठोपाठ बसपाला २९ टक्के फायदा होईल. राज्यात काँग्रेसची अवस्था खराबच असल्याचे दिसून येते. 'सपा'मधील वादामुळे काँग्रेसला केवळ ६ टक्केच फायदा होईल, असे लोकांना वाटते. एकूणच राज्यात भाजप आणि बसपा या दोन्ही पक्षांना चांगले दिवस येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेशच!
पक्षातील वादाचा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या प्रतिमेवर फार परिणाम झाला नसल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा यावर ३१ टक्के लोकांनी अखिलेश यांची निवड केली. तर माजी मुख्यमंत्री मायावती यांनी २७ टक्के मते मिळाली. सर्व्हेतील २४ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे योगी आदित्यनाथ योग्य असल्याचे म्हटले आहे.
अखिलेश यांच्या नव्या पक्षाला विरोध
पक्षातील अंतर्गत वादामुळे अखिलेश यादव यांनी नवा पक्ष स्थापन करण्यास लोकांनी विरोध दर्शवला आहे. ५५ टक्के लोकांनी याला विरोध तर १९ टक्के लोकांनी अखिलेश यांनी नवा पक्ष स्थापन करावा, असे म्हटले आहे. या वादामुळे पक्षप्रमुख मुलायम सिंह यांची प्रतिमा सर्वाधिक खराब झाल्याचे लोकांना वाटते. या संपूर्ण वादाला शिवपाल सिंह यादव जबाबदार असल्याचे ४३ टक्के लोकांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा थेट फायदा भाजपला होणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यादव यांच्यातील तणावामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत 'सपा'ला मोठा फटका बसण्याची शक्यता एका सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात पक्षाची प्रतिमा खराब झाली असली तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून अखिलेश यांनाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
एबीपी न्यूज आणि सिरोस यांनी २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पाच विधानसभा मतदारसंघात सर्व्हे घेतला. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या पैकी ३९ टक्के लोकांच्या मते 'सपा'मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा भाजपला होईल असे वाटते. तर त्यापाठोपाठ बसपाला २९ टक्के फायदा होईल. राज्यात काँग्रेसची अवस्था खराबच असल्याचे दिसून येते. 'सपा'मधील वादामुळे काँग्रेसला केवळ ६ टक्केच फायदा होईल, असे लोकांना वाटते. एकूणच राज्यात भाजप आणि बसपा या दोन्ही पक्षांना चांगले दिवस येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेशच!
पक्षातील वादाचा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या प्रतिमेवर फार परिणाम झाला नसल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा यावर ३१ टक्के लोकांनी अखिलेश यांची निवड केली. तर माजी मुख्यमंत्री मायावती यांनी २७ टक्के मते मिळाली. सर्व्हेतील २४ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे योगी आदित्यनाथ योग्य असल्याचे म्हटले आहे.
अखिलेश यांच्या नव्या पक्षाला विरोध
पक्षातील अंतर्गत वादामुळे अखिलेश यादव यांनी नवा पक्ष स्थापन करण्यास लोकांनी विरोध दर्शवला आहे. ५५ टक्के लोकांनी याला विरोध तर १९ टक्के लोकांनी अखिलेश यांनी नवा पक्ष स्थापन करावा, असे म्हटले आहे. या वादामुळे पक्षप्रमुख मुलायम सिंह यांची प्रतिमा सर्वाधिक खराब झाल्याचे लोकांना वाटते. या संपूर्ण वादाला शिवपाल सिंह यादव जबाबदार असल्याचे ४३ टक्के लोकांचे म्हणणे आहे.