अ‍ॅपशहर

हरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती

सरकार स्थापन करण्यासाठी एका-एका जागेला किती महत्त्वं असतं याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेतच आहे. राज्यात ५६ जागा असणाऱ्या शिवसेना आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप यांचं मुख्यमंत्रीपदावरुन बिनसलं. पण हीच भाजपा हरियाणात दबावात असल्याचं चित्र आहे. कारण, १० आमदार असलेल्या पक्षाला हरियाणातील भाजपने ११ महत्त्वाची खाती दिली आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपला हरियाणात जननायक जनता पार्टी (जेजेपी) चा आधार घ्यावा लागला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2019, 5:08 pm
नवी दिल्ली : सरकार स्थापन करण्यासाठी एका-एका जागेला किती महत्त्वं असतं याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेतच आहे. राज्यात ५६ जागा असणाऱ्या शिवसेना आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप यांचं मुख्यमंत्रीपदावरुन बिनसलं. पण हीच भाजपा हरियाणात दबावात असल्याचं चित्र आहे. कारण, १० आमदार असलेल्या पक्षाला हरियाणातील भाजपने ११ महत्त्वाची खाती दिली आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपला हरियाणात जननायक जनता पार्टी (जेजेपी) चा आधार घ्यावा लागला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp gives 11 portfolios to jjp in haryana
हरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती


मनोहर लाल खट्टर यांच्या कॅबिनेटच्या विस्ताराच्या एक दिवस अगोदरच खातेवाटप करण्यात आलं. यावेळी जेजेपीला भाजपने तब्बल ११ विभाग दिले आहेत. केवळ १० जागा असणाऱ्या जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री आहेत. याशिवाय ११ विभागही जेजेपीला मिळाले. या विभागांमध्ये उत्पादन शुल्क, उद्योग, कामगार, नागरी उड्डाण, लोक निर्माण, विकास आणि पंचायत, पुरातत्व संग्रहालय, मदत आणि पुनर्वसन या विभागांचा समावेश आहे.

वाचा : सत्तावाटपाची चर्चा शहांनी मोदींपासून लपवली; संजय राऊत यांचा आरोप

हरियाणा सरकारमध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत फक्त उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनीच शपथ घेतली होती. खातेवाटप झाल्यानंतर आता इतर मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना दिलेल्या विभागांशिवाय सर्व विभाग अजून मनोहर लाल खट्टर यांच्याकडेच आहेत. मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर खातेवाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे.

हरियाणा विधानसभेत भाजपने सर्वाधिक ४० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण बहुमतासाठी आवश्यक असलेला ४५ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या जेजेपीने १० जागा जिंकल्या आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. फक्त पाच जागांसाठी भाजपने उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांवर भागीदारी करावी लागली.

वाचा : राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात- निंबाळकर

महाराष्ट्रात भाजप अडचणीत

हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी लागला. पण महाराष्ट्रातील सत्तापेच कायम आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन बिनसलं, ज्यामुळे शिवसेनेने नवे मार्ग शोधणं सुरु केलं. यात भाजपला सत्तेपासून वंचित रहावं लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरु केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज