अ‍ॅपशहर

चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी भाजपने माध्यमांना धमकावलं, राहुल गांधींचा हल्लाबोल

पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमधील तणावाची स्थिती अजूनही कायम आहे. काही भागातून चिनी सैनिक मागे हटल्याचं सांगण्यात येतंय. पण तरीही संकट दूर झालेले नाही. या मुद्द्यावर राहुल गांधींसह काँग्रेसने केंद्र सरकारला घेरलं आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2020, 8:30 pm
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षासह राहुल गांधी यांनी लडाखमधील भारत-चीन तणावावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. लडाखमधील चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारने माध्यमांवर दबाव टाकला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. तर उपग्रहाचे फोटोंवरून काँग्रेस पक्षाने पाच मुद्दे मांडत सरकारला घेरले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी भाजपने माध्यमांना धमकावलं, राहुल गांधींचा हल्लाबोल


भाजपचा खोटा प्रचार, राहुल गांधींचा हल्लाबोल

सरकारी संस्थांचा उपयोग करून भाजप खोटा प्रचार करतोय. करोनावरील चाचण्यांवर निर्बंध आणि मृतांची संख्या लवपली जात आहे. जीडीपीसाठी नवीन मोजणी पद्धत लागू केली आहे. तसंच चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी माध्यमांना धमकावलं जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांधी यसंदर्भात ट्विट केलंय.

'चीनचा लडाखमध्ये भारताच्या भूमीवर कब्जा'

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत चीनशी सुरू असलेल्या तणावावरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रसेन यावेळी पाच मुद्दे मांडले आहे. हे पाच मुद्दे पुढील प्रमाणे...

१. चीनने लडाखमध्ये अजूनही दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग प्लेन्स भागात भारतीय भूमीवर कब्जा केलेला आहे. तसंच तिथे चिनी सैन्याने बांधकामही सुरू केले आहे.

२. पेट्रोलिंग पॉइंट १० ते पेट्रोलिंग पॉइंट १३पर्यंत चीनने भारतीय सैन्यला गस्त घालण्यास मनाई केला आहे.

३. फिंगर-४ आणि फिंगर-८ मध्ये चिनी सैन्याने भारताच्या ८ किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे. तिथे ३००० चिनी सैनिक आहेत.

४. लडाखमध्ये सीमेवरील मे-२०२० पूर्वीची स्थिती कायम करण्यास चीनने नकार दिला आहे.

राफेल तैनात करणार; चीन सीमेवरील तणावावर हवाई दलाच्या कमांडर्सची बैठक

मुंबईत धारावीत आणि दिल्लीत सामूहिक संसर्ग, IMAच्या दाव्याला तज्ज्ञ डॉक्टरांचा दुजोरा

५. चीनने लडाखमध्ये भारतील सीमेला असलेल्या गुन्सा येथील नागरी विमानासाठी असलेल्या धापट्टीचं रुपांतर हवाई दलाच्या विमानांसाठी केलं. यामुळे धोका वाढला आहे. तसंच भारतीय सीमेवर चीनने जवळपास २० हजार सैनिक तैनात केले आहेत, असे आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज