लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला असला तरी उत्तर प्रदेशात फैलावलेल्या कोविड १९ संक्रमणाच्या परिस्थितीत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताना दिसत आहेत. याचा पुरावाच एका भाजप आमदारांनी समोर आणलाय. मेडिकल सुविधांच्या कमतरतेवर बोट ठेवत उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी यांनी आपल्याच सरकारवर आगपाखड केलीय.
आग्राच्या एस एन मेडिकल कॉलेजमध्ये करोना संक्रमित पत्नीला योग्य उपचार मिळू शकले नाहीत, याची खंत भाजप आमदार पप्पू लोधी यांनी व्यक्त केलीय. पप्पू लोधी हे फिरोजाबादच्या जनपदच्या जसरानाचे भाजप आमदार आहेत.
करोना संक्रमित आढळलेल्या पत्नीला रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर त्यांना आग्र्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु, अनेक तास उलटल्यानंतरही त्यांना बेड मिळत नव्हता. त्यामुळे तब्बल तीन तास त्यांना जमिनीवरच झोपवण्यात आलं होतं, असं पप्पू लोधी यांनी म्हटलंय.
पत्नीची तब्येत कशी आहे, ते सांगितलं जात नाही. ना जेवण दिलं जात, ना पाणी... अधिकारी आणि डॉक्टर काहीही करत नाहीत, असा आरोप पप्पू लोधी यांनी केलाय.
गेल्या ३० एप्रिल रोजी पप्पू लोधी स्वत: करोना संक्रमित आढळले होते. त्यानंतर त्यांची पत्नी संध्या लोधी यादेखील करोना संक्रमित आढळल्या. सुरुवातीला त्यांना फिरोजाबादच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर पप्पू लोधी यांची तब्येत सुधारल्यानं त्यांची आयसोलेशन वॉर्डातून सुटका करण्यात आली. परंतु, पत्नीची तब्येत बिघडल्यानं त्यांना एस एन मेडिकल कॉलेजमध्ये ७ मे रोजी हलवण्यात आलं.
जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर मोठ्या मुश्किलीनं संध्या लोधी यांना बेड उपलब्ध करून देण्यात आला. परंतु, त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून अजूनही माहिती दिली जात नाही, असा आरोप पप्पू लोधी यांनी केलाय.
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्याच पत्नीला या परिस्थितीतून जावं लागत असेल तर सामान्य जनतेचं काय? अशी चर्चा यामुळे सुरू झालीय.
आग्राच्या एस एन मेडिकल कॉलेजमध्ये करोना संक्रमित पत्नीला योग्य उपचार मिळू शकले नाहीत, याची खंत भाजप आमदार पप्पू लोधी यांनी व्यक्त केलीय. पप्पू लोधी हे फिरोजाबादच्या जनपदच्या जसरानाचे भाजप आमदार आहेत.
करोना संक्रमित आढळलेल्या पत्नीला रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर त्यांना आग्र्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु, अनेक तास उलटल्यानंतरही त्यांना बेड मिळत नव्हता. त्यामुळे तब्बल तीन तास त्यांना जमिनीवरच झोपवण्यात आलं होतं, असं पप्पू लोधी यांनी म्हटलंय.
पत्नीची तब्येत कशी आहे, ते सांगितलं जात नाही. ना जेवण दिलं जात, ना पाणी... अधिकारी आणि डॉक्टर काहीही करत नाहीत, असा आरोप पप्पू लोधी यांनी केलाय.
गेल्या ३० एप्रिल रोजी पप्पू लोधी स्वत: करोना संक्रमित आढळले होते. त्यानंतर त्यांची पत्नी संध्या लोधी यादेखील करोना संक्रमित आढळल्या. सुरुवातीला त्यांना फिरोजाबादच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर पप्पू लोधी यांची तब्येत सुधारल्यानं त्यांची आयसोलेशन वॉर्डातून सुटका करण्यात आली. परंतु, पत्नीची तब्येत बिघडल्यानं त्यांना एस एन मेडिकल कॉलेजमध्ये ७ मे रोजी हलवण्यात आलं.
जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर मोठ्या मुश्किलीनं संध्या लोधी यांना बेड उपलब्ध करून देण्यात आला. परंतु, त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून अजूनही माहिती दिली जात नाही, असा आरोप पप्पू लोधी यांनी केलाय.
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्याच पत्नीला या परिस्थितीतून जावं लागत असेल तर सामान्य जनतेचं काय? अशी चर्चा यामुळे सुरू झालीय.