नवी दिल्ली:
'देशातील राजकारणात २०१४ नंतर मोठा बदल झाला आहे. मोदी सरकारने घराणेशाही, जातीयवाद संपवून 'पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स' धोरण अवलंबले आहे. खऱ्या अर्थानं भाजपने देशाला सर्वात जास्त कष्ट करणारा पंतप्रधान दिला असून तो १५-१६ तास काम करतोय', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.
केंद्रातील मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहा यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली तर काँग्रेसवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारने केलेल्या कामांचे कौतुक केले. गरीबी आणि भ्रष्टाचाराला हटवण्याचं धोरण मोदी राबवित आहेत. तर मोदींना हटवण्यासाठी विरोधक मोदींच्या विरुद्ध खोटा प्रचार करीत आहेत, असा आरोप केला. लोकशाहीला पायदळी तुडवणारे आज म्हणत आहेत की, देशात भीतीचे वातावरण आहे, अशी टीका शहा यांनी काँग्रेसवर केली. देशातील जनता ही भक्कमपणे आमच्यासोबत उभी असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, असं अमित शहा म्हणाले.
केंद्रात चांगलं काम केल्याने आज एनडीएचे २० राज्यात सरकार आहे. देशातील ६५ टक्के जनतेची सेवा आम्ही करतोय. तसेच अनेक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपनं चांगली कामगीरी केली आहे. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला घर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरीबांना गॅस सिलिंडर दिले. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील दीड कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडल्याची आठवणही शहा यांनी यावेळी करून दिली.
'देशातील राजकारणात २०१४ नंतर मोठा बदल झाला आहे. मोदी सरकारने घराणेशाही, जातीयवाद संपवून 'पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स' धोरण अवलंबले आहे. खऱ्या अर्थानं भाजपने देशाला सर्वात जास्त कष्ट करणारा पंतप्रधान दिला असून तो १५-१६ तास काम करतोय', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.
केंद्रातील मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहा यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली तर काँग्रेसवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारने केलेल्या कामांचे कौतुक केले. गरीबी आणि भ्रष्टाचाराला हटवण्याचं धोरण मोदी राबवित आहेत. तर मोदींना हटवण्यासाठी विरोधक मोदींच्या विरुद्ध खोटा प्रचार करीत आहेत, असा आरोप केला. लोकशाहीला पायदळी तुडवणारे आज म्हणत आहेत की, देशात भीतीचे वातावरण आहे, अशी टीका शहा यांनी काँग्रेसवर केली. देशातील जनता ही भक्कमपणे आमच्यासोबत उभी असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, असं अमित शहा म्हणाले.
केंद्रात चांगलं काम केल्याने आज एनडीएचे २० राज्यात सरकार आहे. देशातील ६५ टक्के जनतेची सेवा आम्ही करतोय. तसेच अनेक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपनं चांगली कामगीरी केली आहे. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला घर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरीबांना गॅस सिलिंडर दिले. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील दीड कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडल्याची आठवणही शहा यांनी यावेळी करून दिली.