नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी हे सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एकावर एक प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी हे मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पाहून भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांना त्यांचेच अस्त्र वापरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी हे संरक्षण समितीचे सदस्य आहेत. मात्र तरी देखील ते समितीच्या कोणत्याही बैठकीला येत नाहीत. उलट ते ते देशाचे मनोबल नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
जे.पी. नड्डा यांनी ट्विट करत राहुल गांधींवर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'राहुल गांधी हे एक गौरवशाली वंश परंपरेशी जोडले आहेत, तेथे समितीला काही महत्त्व नसते. काँग्रेसमध्ये असे अनेक सदस्य आहेत, ज्यांना संसदीय प्रकरणांची चांगली जाण आहे. मात्र, एक राजवंश अशा नेत्यांना कधी पुढे येऊ देत नाही.'
वाचा: मोदी सरकारच्या 'या' अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होणार; राहुल गांधींचा निशाणा
जे. पी. नड्डा यांनी आणखी एक ट्विट केले आहे. राहुल गांधी संरक्षण समितीचे सदस्य असतानाही ते समितीच्या बैठकांना हजर राहत नाहीत हे निराशाजनक आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे. ते सतत देशाचे मनोबल कमी करण्याचे काम करत आहेत. आमच्या सशस्त्र दलांच्या वीरतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि एका जबाबदार विरोधी पक्षाच्या नेत्याने करणे गैर आहे, असे सारे काही राहुल गांधी करत असल्याचे नड्डा यांचे म्हणणे आहे.
वाचा: पंतप्रधान मोदींनी बिहार भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' महामंत्र
ग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना सप्टेंबर २०१९ मध्ये संरक्षण समितीचे सदस्यत्व मिळाले होते. या समितीत राहुल गांधी यांच्यासह २१ लोकसभा सदस्य आणि १० राज्यसभा सदस्य यांचा सहभाग आहे. संरक्षण समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री जुएल ओराम हे आहेत. या समितीच्या गेल्या वर्षभराच्या काळात सुमारे १२ बैठका झाल्यात. परंतु, राहुल गांधी हे एकाही बैठकीला हजर राहिलेले नाहीत.
वाचा: 'त्यांच्या' इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल; राहुल गांधींचे आवाहन
जे.पी. नड्डा यांनी ट्विट करत राहुल गांधींवर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'राहुल गांधी हे एक गौरवशाली वंश परंपरेशी जोडले आहेत, तेथे समितीला काही महत्त्व नसते. काँग्रेसमध्ये असे अनेक सदस्य आहेत, ज्यांना संसदीय प्रकरणांची चांगली जाण आहे. मात्र, एक राजवंश अशा नेत्यांना कधी पुढे येऊ देत नाही.'
वाचा: मोदी सरकारच्या 'या' अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होणार; राहुल गांधींचा निशाणा
जे. पी. नड्डा यांनी आणखी एक ट्विट केले आहे. राहुल गांधी संरक्षण समितीचे सदस्य असतानाही ते समितीच्या बैठकांना हजर राहत नाहीत हे निराशाजनक आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे. ते सतत देशाचे मनोबल कमी करण्याचे काम करत आहेत. आमच्या सशस्त्र दलांच्या वीरतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि एका जबाबदार विरोधी पक्षाच्या नेत्याने करणे गैर आहे, असे सारे काही राहुल गांधी करत असल्याचे नड्डा यांचे म्हणणे आहे.
वाचा: पंतप्रधान मोदींनी बिहार भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' महामंत्र
ग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना सप्टेंबर २०१९ मध्ये संरक्षण समितीचे सदस्यत्व मिळाले होते. या समितीत राहुल गांधी यांच्यासह २१ लोकसभा सदस्य आणि १० राज्यसभा सदस्य यांचा सहभाग आहे. संरक्षण समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री जुएल ओराम हे आहेत. या समितीच्या गेल्या वर्षभराच्या काळात सुमारे १२ बैठका झाल्यात. परंतु, राहुल गांधी हे एकाही बैठकीला हजर राहिलेले नाहीत.
वाचा: 'त्यांच्या' इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल; राहुल गांधींचे आवाहन