म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह पक्षाचे अनेक प्रवक्ते मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्यानुसार त्यांनी मोर्चेबांधणीचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
संबित पात्रा यांनी पुरी मतदारसंघात आपली सक्रियता वाढवली असून, पक्षाची उमेदवारी मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. याशिवाय माजी केंद्रीय आणि पक्षाचे प्रवक्ते शहनवाझ हुसैन बिहारच्या भागलपूर मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक आहे. भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी बिहारच्या सारण मतदारसंघातून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री उत्तर प्रदेशातील मछलीशहर किंवा रॉबर्टस् गंज मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छितात, तर शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, ज्येष्ठ भाजपनेते विनय कटियार आणि स्वामी चिन्मयानंद यांची उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघावर नजर आहे. सुलतानपूर मतदारसंघातून निवडून आलेले वरुण गांधी यांना त्यांच्या आई मनेका गांधी यांच्या पिलीभीत मतदारसंघात पाठविण्याचा भाजपश्रेष्ठींचा विचार आहे. मनेका यांना हरयाणाच्या कुरुक्षेत्र किंवा कर्नाल मतदारसंघातून उमेदवारी देण्यावर विचार सुरु आहे.
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. २०१४च्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून मीनाक्षी लेखी निवडून आल्या होत्या. पण आता त्यांनी हा मतदारसंघ गौतम गंभीरसाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांमध्ये १२ मे रोजी मतदान होणार असल्यामुळे भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. मीनाक्षी लेखींव्यतिरिक्त भाजपचे प्रवेश वर्मा, उदित राज, महेश गिरी यांना विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह लागले असून, केवळ मनोज तिवारी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. चांदणी चौकातून विजयी झालेले केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन पूर्व दिल्लीतून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
...
\Bपुरीची शक्यता मावळली\B
पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. ओडिशामध्ये भाजपची हवा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुरीमधून निवडणूक लढवावी, अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती. पण हा प्रस्ताव बारगळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात लढणे पंतप्रधान मोदींसाठी अनिवार्य ठरले आहे. ते केवळ वाराणशी मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असून, दुसऱ्या मतदारसंघातून लढायचे झाल्यास गुजरातवरील पकड कायम ठेवण्यासाठी सौराष्ट्राच्या राजकोट मतदारसंघातूनही ते निवडणूक लढण्याचा विचार करू शकतात, असे समजते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह पक्षाचे अनेक प्रवक्ते मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्यानुसार त्यांनी मोर्चेबांधणीचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
संबित पात्रा यांनी पुरी मतदारसंघात आपली सक्रियता वाढवली असून, पक्षाची उमेदवारी मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. याशिवाय माजी केंद्रीय आणि पक्षाचे प्रवक्ते शहनवाझ हुसैन बिहारच्या भागलपूर मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक आहे. भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी बिहारच्या सारण मतदारसंघातून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री उत्तर प्रदेशातील मछलीशहर किंवा रॉबर्टस् गंज मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छितात, तर शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, ज्येष्ठ भाजपनेते विनय कटियार आणि स्वामी चिन्मयानंद यांची उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघावर नजर आहे. सुलतानपूर मतदारसंघातून निवडून आलेले वरुण गांधी यांना त्यांच्या आई मनेका गांधी यांच्या पिलीभीत मतदारसंघात पाठविण्याचा भाजपश्रेष्ठींचा विचार आहे. मनेका यांना हरयाणाच्या कुरुक्षेत्र किंवा कर्नाल मतदारसंघातून उमेदवारी देण्यावर विचार सुरु आहे.
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. २०१४च्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून मीनाक्षी लेखी निवडून आल्या होत्या. पण आता त्यांनी हा मतदारसंघ गौतम गंभीरसाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांमध्ये १२ मे रोजी मतदान होणार असल्यामुळे भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. मीनाक्षी लेखींव्यतिरिक्त भाजपचे प्रवेश वर्मा, उदित राज, महेश गिरी यांना विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह लागले असून, केवळ मनोज तिवारी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. चांदणी चौकातून विजयी झालेले केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन पूर्व दिल्लीतून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
...
\Bपुरीची शक्यता मावळली\B
पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. ओडिशामध्ये भाजपची हवा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुरीमधून निवडणूक लढवावी, अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती. पण हा प्रस्ताव बारगळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात लढणे पंतप्रधान मोदींसाठी अनिवार्य ठरले आहे. ते केवळ वाराणशी मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असून, दुसऱ्या मतदारसंघातून लढायचे झाल्यास गुजरातवरील पकड कायम ठेवण्यासाठी सौराष्ट्राच्या राजकोट मतदारसंघातूनही ते निवडणूक लढण्याचा विचार करू शकतात, असे समजते.