स्थानिक निवडणुकीत यश
वृत्तसंस्था, गांधीनगर
नोटाबंदीचा निर्णय गुजरातमध्ये भाजपवर उलटण्याचा राजकीय विश्लेषकांचा होरा साफ चुकला असून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. भाजपने दोन नगरपालिका, एक ग्रामपंचायत आणि ११ नगरपालिकांमधील पोटनिवडणुका, सात जिल्हा पंचायती आणि १५ तालुका पंचायतींच्या जागांवर स्पष्ट विजय मिळवला आहे.
सुरतमधील कनकपूर-कनसाड नगरपालिकेत भाजपने २८ पैकी २७ जागा, तर वापी नगरपालिकेत ४४ पैकी ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. गोंदल तालुका पंचायतीत भाजपने २२पैकी १८ जागा जिंकल्या. जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत सात पैकी पाच पंचायतींवर भाजपने स्पष्ट विजय मिळवला आहे. १५ तालुका पंचायतींच्या पोटनिवडणुकीत भाजपने पाच ठिकाणी, तर काँग्रेसने चार ठिकाणी विजय मिळवला. इतर सहा पंचायतींच्या निवडणुका तांत्रिक कारणांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. ‘गेल्या काही दिवसांत देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुका झाल्या. ईशान्येकडी राज्ये, पश्चिम बंगाल असो वा मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात असो, भाजपने उत्तम कामगिरी केली आहे. मी लोकांचे आभार मानतो. लोकांना देशाचा सर्वांगीण विकास हवा आहे आणि ते भ्रष्टाचार आणि गैरकारभार सहन करणार नाहीत हेच या निकालातून दिसून येते,’ असे मोदी यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था, गांधीनगर
नोटाबंदीचा निर्णय गुजरातमध्ये भाजपवर उलटण्याचा राजकीय विश्लेषकांचा होरा साफ चुकला असून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. भाजपने दोन नगरपालिका, एक ग्रामपंचायत आणि ११ नगरपालिकांमधील पोटनिवडणुका, सात जिल्हा पंचायती आणि १५ तालुका पंचायतींच्या जागांवर स्पष्ट विजय मिळवला आहे.
सुरतमधील कनकपूर-कनसाड नगरपालिकेत भाजपने २८ पैकी २७ जागा, तर वापी नगरपालिकेत ४४ पैकी ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. गोंदल तालुका पंचायतीत भाजपने २२पैकी १८ जागा जिंकल्या. जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत सात पैकी पाच पंचायतींवर भाजपने स्पष्ट विजय मिळवला आहे. १५ तालुका पंचायतींच्या पोटनिवडणुकीत भाजपने पाच ठिकाणी, तर काँग्रेसने चार ठिकाणी विजय मिळवला. इतर सहा पंचायतींच्या निवडणुका तांत्रिक कारणांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. ‘गेल्या काही दिवसांत देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुका झाल्या. ईशान्येकडी राज्ये, पश्चिम बंगाल असो वा मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात असो, भाजपने उत्तम कामगिरी केली आहे. मी लोकांचे आभार मानतो. लोकांना देशाचा सर्वांगीण विकास हवा आहे आणि ते भ्रष्टाचार आणि गैरकारभार सहन करणार नाहीत हेच या निकालातून दिसून येते,’ असे मोदी यांनी म्हटले आहे.