मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
प्रचंड बहुमत व प्रचंड अपेक्षांचे ओझे घेऊन सत्तेवर आलेले केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या २६ मे रोजी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. मोदी सरकारची ही वर्षपूर्ती देशभर २०० कार्यक्रम आयोजित करून साजरी करण्याचा निर्णय भाजपनं घेतला असून त्या माध्यमातून सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवसापासून म्हणजेच, २६ मे पासून १० जूनपर्यंत हे कार्यक्रम होतील. तब्बल १५ दिवसांच्या या कार्यक्रमांत लोकांसोबत बैठका, बुद्धीवंतांशी चर्चा, पत्रकार परिषदा व परिसंवादांचा समावेश असेल. भाजपच्या खासदार व आमदारांसह देशभरातील पक्ष कार्यकर्ते यात सहभागी होतील. त्यासाठी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक दिवस व एक रात्र थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, आमदारांना मतदारसंघात किमान सात दिवस तळ ठोकण्यास सांगण्यात आलं आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी भाजपच्या देशभरातील प्रवक्त्यांची एक कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी हे मार्गदर्शन करणार आहेत. सोशल मीडियाचाही यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सरकारनं राबवलेल्या योजना व कार्यक्रमांची माहिती देशवासीयांना देणं हा यामागचा प्रमुख हेतू असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.
प्रचंड बहुमत व प्रचंड अपेक्षांचे ओझे घेऊन सत्तेवर आलेले केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या २६ मे रोजी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. मोदी सरकारची ही वर्षपूर्ती देशभर २०० कार्यक्रम आयोजित करून साजरी करण्याचा निर्णय भाजपनं घेतला असून त्या माध्यमातून सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवसापासून म्हणजेच, २६ मे पासून १० जूनपर्यंत हे कार्यक्रम होतील. तब्बल १५ दिवसांच्या या कार्यक्रमांत लोकांसोबत बैठका, बुद्धीवंतांशी चर्चा, पत्रकार परिषदा व परिसंवादांचा समावेश असेल. भाजपच्या खासदार व आमदारांसह देशभरातील पक्ष कार्यकर्ते यात सहभागी होतील. त्यासाठी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक दिवस व एक रात्र थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, आमदारांना मतदारसंघात किमान सात दिवस तळ ठोकण्यास सांगण्यात आलं आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी भाजपच्या देशभरातील प्रवक्त्यांची एक कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी हे मार्गदर्शन करणार आहेत. सोशल मीडियाचाही यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सरकारनं राबवलेल्या योजना व कार्यक्रमांची माहिती देशवासीयांना देणं हा यामागचा प्रमुख हेतू असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.