नवी दिल्ली:
उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतर बसप प्रमुख मायावती यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बॅलेट पेपरने मतदान घेऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. बॅलेट पेपरने मतदान घेतल्यास बसपकडून भाजपचा पराभव अटळ आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निकाल शुक्रवारी जाहीर झाले. भाजप पहिला तर बसप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या यशानंतर बसप प्रमुख मायावती यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मतदान यंत्रांमध्ये घोळ केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. 'भाजप प्रामाणिक आणि त्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल तर मतदान यंत्रे हटवून बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे. तसे केल्यास २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावर्षी विधानसभा निवडणुकीत बसपचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मायावती यांनी मतदान यंत्रांत फेरफार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपने यंत्रांमध्ये फेरफार केल्यानेच पक्षाचा पराभव झाला, असे त्या म्हणाल्या होत्या.
उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतर बसप प्रमुख मायावती यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बॅलेट पेपरने मतदान घेऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. बॅलेट पेपरने मतदान घेतल्यास बसपकडून भाजपचा पराभव अटळ आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निकाल शुक्रवारी जाहीर झाले. भाजप पहिला तर बसप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या यशानंतर बसप प्रमुख मायावती यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मतदान यंत्रांमध्ये घोळ केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. 'भाजप प्रामाणिक आणि त्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल तर मतदान यंत्रे हटवून बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे. तसे केल्यास २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावर्षी विधानसभा निवडणुकीत बसपचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मायावती यांनी मतदान यंत्रांत फेरफार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपने यंत्रांमध्ये फेरफार केल्यानेच पक्षाचा पराभव झाला, असे त्या म्हणाल्या होत्या.