मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी बीरेनसिंह यांचा आज शपथविधी
वृत्तसंस्था, इम्फाळ
गोव्यापाठोपाठ मणिपूरही अखेर काँग्रेसच्या हातून निसटले. आकड्यांच्या राजकीय खेळात काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने राज्यपालांसमोर संख्याबळ सिद्ध केल्याने आज, बुधवारी राज्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. आज, बुधवारी दुपारी १ वाजता भाजपचे एन. बीरेनसिंह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
६० सदस्यसंख्या असलेल्या मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे २८ तर भाजपचे २१ आमदार निवडून आले होते. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक ३१ आमदारांचे समर्थन मिळवणे काँग्रेसला शक्य झाले नाही. राज्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या नागा पीपल्स फ्रंटच्या चार आमदारांचा आपल्याच पक्षाला पाठिंबा असल्याचे काँग्रेसने सोमवारी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते. मात्र त्याजोडीला संबंधित आमदारांचे कोणतेही संमतीपत्र जोडले नव्हते. मात्र मंगळवारी भाजपने थेट राज्यपालांसमोरच शक्तिप्रदर्शन केले.
भाजपचे २१, फ्रंटचे ४, नॅशनल पीपल्स पार्टीचे चार, एलजेपी, तृणमूलचे प्रत्येकी एक आणि धक्कादायक म्हणजे काँग्रेसचा एक आमदारही भाजपच्या बाजूने उभा राहिला. अशा ३२ आमदारांची राज्यपालांसमोर परेड करून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. सोमवारीच काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनीही सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र अखेर मंगळवारी सायंकाळी नजमा हेपतुल्ला यांनी भाजपलाच सत्तास्थापनेचे आवताण दिले.
वृत्तसंस्था, इम्फाळ
गोव्यापाठोपाठ मणिपूरही अखेर काँग्रेसच्या हातून निसटले. आकड्यांच्या राजकीय खेळात काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने राज्यपालांसमोर संख्याबळ सिद्ध केल्याने आज, बुधवारी राज्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. आज, बुधवारी दुपारी १ वाजता भाजपचे एन. बीरेनसिंह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
६० सदस्यसंख्या असलेल्या मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे २८ तर भाजपचे २१ आमदार निवडून आले होते. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक ३१ आमदारांचे समर्थन मिळवणे काँग्रेसला शक्य झाले नाही. राज्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या नागा पीपल्स फ्रंटच्या चार आमदारांचा आपल्याच पक्षाला पाठिंबा असल्याचे काँग्रेसने सोमवारी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते. मात्र त्याजोडीला संबंधित आमदारांचे कोणतेही संमतीपत्र जोडले नव्हते. मात्र मंगळवारी भाजपने थेट राज्यपालांसमोरच शक्तिप्रदर्शन केले.
भाजपचे २१, फ्रंटचे ४, नॅशनल पीपल्स पार्टीचे चार, एलजेपी, तृणमूलचे प्रत्येकी एक आणि धक्कादायक म्हणजे काँग्रेसचा एक आमदारही भाजपच्या बाजूने उभा राहिला. अशा ३२ आमदारांची राज्यपालांसमोर परेड करून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. सोमवारीच काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनीही सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र अखेर मंगळवारी सायंकाळी नजमा हेपतुल्ला यांनी भाजपलाच सत्तास्थापनेचे आवताण दिले.