अ‍ॅपशहर

boat accident in brahmputra river : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये टक्कर, १०० प्रवासी असलेल्या बोटींमधील अनेक जण बेपत्ता

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर नोद बोटींमध्ये भीषण अपघात झाला आहे. यात अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री सरमा यांच्याशी फोनवर बातचीत केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Sep 2021, 7:28 pm
जोरहाटः आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत भीषण नाव दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाली आहे. यात अनेक जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. ही घटना जोरहाट जिल्ह्यातील नीमतीघाटच्या परिसरातील आहे. दोन्ही बोटींमध्ये सुमारे १०० प्रवासी होते. एक बोट माजुलीहून निमतीघाटाकडे जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती. बोटीतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ब्रह्मपुत्रा नदीतील अपघातात बोटीवर सुमारे ५० प्रवासी होते. त्यापैकी ४० जणांना वाचवण्यात आले आहे. इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जोरहाटचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर बर्मन यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम boat accident in brahmputra river assam
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये टक्कर, १०० प्रवासी असलेल्या बोटींमधील अनेक जण बेपत्ता



मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी बोट दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. माजुली आणि जोरहाट जिल्हा प्रशासनांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसंच मंत्री बिमल बोरा यांना लवकरात लवकर माजुलीला पोहचून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रधान सचिव समीर सिन्हा यांना केली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा उद्या माजुलीला पोहोचतील.

Madhya Pradesh: विमानानं दिल्लीला निघालेल्या साध्वीच्या बॅगेत निघाली मानवी कवटी

दरम्यान, आसाममधील दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री हिमंत सरमा यांना फोन केला. तसंच मदत आणि बचावकार्याची माहिती घेतली. वाचवण्यात आलेल्या नागरिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्र सरकार सर्वमदत करण्यास तयार आसल्याचंही गृहमंत्री अमित शहा म्हणाले, अशी माहिती सरमा यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही ट्वीट करून या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तसंच प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

govt hikes msp : गहू, हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन पॅकेज

महत्वाचे लेख