बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना नदीच्या मधोमधच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट बुडाली. या बोटीत ३५ जण होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तब्बल १८ लोकांना नदीतून बाहेर काढले, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला तर १५ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी १७ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. बांदा जिल्ह्यातील मार्का पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना नदीत ही घटना घडली. इथे मार्का बाजूने फतेहपूरकडे येणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.
तब्बल चार तास उलटून गेले तरी अद्याप १७ जणांचा शोध लागलेला नाही. मोठ्या प्रमाणात गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू असून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बांदा येथील यमुना नदीत झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. बांदा जिल्ह्यातील मार्का पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना नदीत ही घटना घडली. इथे मार्का बाजूने फतेहपूरकडे येणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.
तब्बल चार तास उलटून गेले तरी अद्याप १७ जणांचा शोध लागलेला नाही. मोठ्या प्रमाणात गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू असून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बांदा येथील यमुना नदीत झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या.