तरन तारन : पंजाबशी लागून असेलल्या पाकिस्ताना सीमेवर सुरक्षा दलाकडून पाच घुसखोरांना ठार करण्यात आलंय. तरन तारनच्या खेमकरन भागात सीमा सुरक्षा दलानं (BSF) ही मोठी कारवाई केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली. संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
बीएसएफच्या १०३ बटालियनच्या जवानांनी पहाटे ४.४५ वाजता ही कारवाई फत्ते केली. भारत - पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकी भागात काही संदिग्ध हालचाली या जवानांच्या लक्षात आल्या. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत.
वाचा : भारत-चीन तणाव : भारतीय रेल्वेकडून चीनला आणखी एक झटका
वाचा : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्याला अटक
उल्लेखनीय म्हणजे, खेमकरन हा सीमेनजिकचा भाग आहे. ठार करण्यात आलेल्या घुसखोरांकडे असॉल्ट रायफल सापडल्याचंही म्हटलं जातंय. सीमेपलिकडून दहशतवाद्यांना भारतात धाडण्याचं काम केलं जातं. गेल्या काही काळात जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं दहशतवादी घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडलेत.
तसंच पंजाबमध्ये सीमेपलिकडून नशेचा धंदाही पसरवण्याचं काम केलं जातं. नशेची साधनं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून येतात. राज्य सरकारकडून हे रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत परंतु, तरीदेखील अद्याप या प्रयत्नांना पुरेसं यश येऊ शकलेलं नाही.
वाचा : India-China Conflict: आता भारत चीनविरोधात 'हे' मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत
वाचा : 'इस्रो' खासगीकरणाच्या जोरदार चर्चा; अध्यक्ष के सिवन यांचं स्पष्टीकरण
बीएसएफच्या १०३ बटालियनच्या जवानांनी पहाटे ४.४५ वाजता ही कारवाई फत्ते केली. भारत - पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकी भागात काही संदिग्ध हालचाली या जवानांच्या लक्षात आल्या. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत.
वाचा : भारत-चीन तणाव : भारतीय रेल्वेकडून चीनला आणखी एक झटका
वाचा : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्याला अटक
उल्लेखनीय म्हणजे, खेमकरन हा सीमेनजिकचा भाग आहे. ठार करण्यात आलेल्या घुसखोरांकडे असॉल्ट रायफल सापडल्याचंही म्हटलं जातंय. सीमेपलिकडून दहशतवाद्यांना भारतात धाडण्याचं काम केलं जातं. गेल्या काही काळात जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं दहशतवादी घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडलेत.
तसंच पंजाबमध्ये सीमेपलिकडून नशेचा धंदाही पसरवण्याचं काम केलं जातं. नशेची साधनं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून येतात. राज्य सरकारकडून हे रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत परंतु, तरीदेखील अद्याप या प्रयत्नांना पुरेसं यश येऊ शकलेलं नाही.
वाचा : India-China Conflict: आता भारत चीनविरोधात 'हे' मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत
वाचा : 'इस्रो' खासगीकरणाच्या जोरदार चर्चा; अध्यक्ष के सिवन यांचं स्पष्टीकरण