अ‍ॅपशहर

बुरहानच्या वडिलांनी घेतली श्रीश्रींची भेट

सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी मारला गेल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून काश्मीर खोरं हिंसाचाराच्या आगीत होरपळत असतानाच बुरहानचे वडील मुझफ्फर वाणी यांनी बेंगळुरू येथे आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली आहे. वाणी यांनी दोन दिवस रविशंकर यांच्या आश्रमात मुक्काम केला. यादरम्यान, काश्मिरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी काय उपाय करता येतील, यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Maharashtra Times 28 Aug 2016, 11:47 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम burhans dad meets sri sri discusses path to peace
बुरहानच्या वडिलांनी घेतली श्रीश्रींची भेट


सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी मारला गेल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून काश्मीर खोरं हिंसाचाराच्या आगीत होरपळत असतानाच बुरहानचे वडील मुझफ्फर वाणी यांनी बेंगळुरू येथे आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली आहे. वाणी यांनी दोन दिवस रविशंकर यांच्या आश्रमात मुक्काम केला. यादरम्यान, काश्मिरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी काय उपाय करता येतील, यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

श्री श्री यांनीही ट्विट करून मुझफ्फर वाणी दोन दिवस आश्रमात होते आणि त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. या भेटीचा फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. श्री श्री आणि वाणी यांच्यात काश्मीरमधील सद्यस्थिती आणि तणावाबाबत चर्चा झाली. काश्मीरमधील हिंसाचार थांबावा. स्थिती सामान्य व्हावी, एवढाच उद्देश या चर्चेमागे होता, असे आर्ट ऑफ लिविंगकडून सांगण्यात आले आहे.


Muzaffar Wani, the father of Burhan Wani was in the ashram for the last 2 days. We discussed several issues. pic.twitter.com/IDyyxJSG83 — Sri Sri Ravi Shankar (@SriSri) August 27, 2016
मी उपचारांसाठी गेलो होतो!

'मी श्री श्री यांच्या आश्रमात उपचारांसाठी गेलो होतो. त्यासाठी दोन दिवस मी तिथे राहिलो. श्री श्री यांच्याशी फक्त पाचच मिनिटं माझं बोलणं झालं. माझ्यासाठी मी काही औषधही आश्रमातून घेतली', अशी प्रतिक्रिया वाणी यांनी 'काश्मीर रीडर' या दैनिकाला फोनवरून दिली. श्री श्री यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील मात्र त्यांनी सांगितला नाही.

दरम्यान, बुरहान चकमकीत मारला गेल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत हिंसाचाराच्या घटनांमध्ये काश्मिरात ७० जणांचा मृत्यू झाला आहे तर ११ हजारावर लोक जखमी झाले आहेत. काश्मिरमधील तणाव निवळावा म्हणून सरकारी पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कालच राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. या पार्श्वभूमीवर श्री श्री-मुजफ्फर वाणी भेट महत्त्वाची मानली जात आहे. काश्मीरसाठी श्री श्री रविशंकर शांतीदूत ठरतात का?, याचा उलगडा येत्या काळात होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज