इंदूर: मोदी सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणल्यानंतर देशात घुसखोरांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. घुसखोरांना कसं ओळखायचं याच्या टीप्स सीएए समर्थक जाहीर कार्यक्रमांमध्ये देऊ लागले आहेत. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नुकतीच अलीकडंच याबाबत एक वक्तव्य केलं. 'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून मी एका बांगलादेशी मजुराला ओळखलं,' असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता चर्चा रंगली आहे.
इंदूर प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'लोकशाही, राज्यघटना आणि नागरिकत्व' या विषयावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. 'माझ्या घरातली एक खोली मी हल्लीच दुरुस्त करून घेतली. त्या कामावर असलेले मजूर एकदा पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. ते मजूर बांगलादेशी आहेत का, याची चौकशी मी कंत्राटदाराकडं केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत,' असं विजयवर्गीय म्हणाले. 'या प्रकरणी मी अद्याप पोलिसांकडं तक्रार केलेली नाही. लोकांना जागरूक करण्यासाठी मी हा किस्सा सांगतोय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकत्व कायदा देशाच्या भल्यासाठीच आहे. या कायद्यामुळं खऱ्या शरणार्थींना नागरिकत्व मिळणार असून घुसखोरांची ओळख पटणार आहे. हे घुसखोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक आहेत,' असं ते म्हणाले.
वाचा: नसीरुद्दीन शहा कृतघ्न; स्वराज कौशल यांची टीका
वाचा: तरुणांच्या आंदोलनामुळे लोकशाही बळकट होईल: प्रणव मुखर्जी
नागरिकत्व कायद्याला होत असलेल्या विरोधामुळं भाजपनं आता कायद्याच्या समर्थनासाठी कंबर कसली आहे. भाजपचे नेते व कार्यकर्ते देशभर कायद्याचं महत्त्व पटवून देत आहेत. विरोधकांवरही टीका करत आहेत. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही यापूर्वी सीएए विरोधकांवर तोफ डागली आहे. 'हे विरोधक कोण आहेत ते त्यांच्या कपड्यांवरून ओळखा,' असं मोदी म्हणाले होते. त्यावरून वादंग माजले होते. आता विजयवर्गीय यांच्या पोहे प्रकरणावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.
वाचा: CAA ला राज्यांचा विरोध राजकीय पाऊल : शशी थरुर
वाचा: राजस्थान सरकारही CAAविरोधात ठराव मांडणार
वाचा: ‘आझादीवाल्यांना देशाबाहेर जाऊ द्यावे'
इंदूर प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'लोकशाही, राज्यघटना आणि नागरिकत्व' या विषयावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. 'माझ्या घरातली एक खोली मी हल्लीच दुरुस्त करून घेतली. त्या कामावर असलेले मजूर एकदा पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. ते मजूर बांगलादेशी आहेत का, याची चौकशी मी कंत्राटदाराकडं केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत,' असं विजयवर्गीय म्हणाले. 'या प्रकरणी मी अद्याप पोलिसांकडं तक्रार केलेली नाही. लोकांना जागरूक करण्यासाठी मी हा किस्सा सांगतोय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकत्व कायदा देशाच्या भल्यासाठीच आहे. या कायद्यामुळं खऱ्या शरणार्थींना नागरिकत्व मिळणार असून घुसखोरांची ओळख पटणार आहे. हे घुसखोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक आहेत,' असं ते म्हणाले.
वाचा: नसीरुद्दीन शहा कृतघ्न; स्वराज कौशल यांची टीका
वाचा: तरुणांच्या आंदोलनामुळे लोकशाही बळकट होईल: प्रणव मुखर्जी
नागरिकत्व कायद्याला होत असलेल्या विरोधामुळं भाजपनं आता कायद्याच्या समर्थनासाठी कंबर कसली आहे. भाजपचे नेते व कार्यकर्ते देशभर कायद्याचं महत्त्व पटवून देत आहेत. विरोधकांवरही टीका करत आहेत. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही यापूर्वी सीएए विरोधकांवर तोफ डागली आहे. 'हे विरोधक कोण आहेत ते त्यांच्या कपड्यांवरून ओळखा,' असं मोदी म्हणाले होते. त्यावरून वादंग माजले होते. आता विजयवर्गीय यांच्या पोहे प्रकरणावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.
वाचा: CAA ला राज्यांचा विरोध राजकीय पाऊल : शशी थरुर
वाचा: राजस्थान सरकारही CAAविरोधात ठराव मांडणार
वाचा: ‘आझादीवाल्यांना देशाबाहेर जाऊ द्यावे'