भोपाळ:
समाजात सर्वात आधी जातीभेद राहिला आहे. त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण सुरूच राहील. हे आरक्षण रद्द केलं जाणार नाही, असं केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी स्पष्ट केलं.
उमा भारती प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. आपलं संरक्षण करण्यासाठी संविधान पुरेसं आहे. नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आपले कायदेही पुरेसे आहेत, असं उमा भारती म्हणाल्या. यावेळी त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण दिलं जावं का? असा प्रश्न विचारला असता त्यावर सर्वांची मतं येऊ द्या, असं म्हणंत त्यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.
लवकरात लवकर मंदिर व्हावं
दरम्यान, राम मंदिराचा निर्णय लवकरात लवकर आला पाहिजे. राम मंदिरावरचा निर्णय उशिरा यावा, असं देशातील कोणत्याही व्यक्तिला वाटत नसेल. वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय काहीच होऊ शकत नाही. तिथली परिस्थितीच तशी आहे, असंही त्या म्हणाल्या. माझ्या मनात आलं तर उद्या जाऊन वादग्रस्त जागेवर भव्य राम मंदिर बांधेन. पण मर्यादा आणि नियमांनी मी बांधली गेलेली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
समाजात सर्वात आधी जातीभेद राहिला आहे. त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण सुरूच राहील. हे आरक्षण रद्द केलं जाणार नाही, असं केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी स्पष्ट केलं.
उमा भारती प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. आपलं संरक्षण करण्यासाठी संविधान पुरेसं आहे. नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आपले कायदेही पुरेसे आहेत, असं उमा भारती म्हणाल्या. यावेळी त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण दिलं जावं का? असा प्रश्न विचारला असता त्यावर सर्वांची मतं येऊ द्या, असं म्हणंत त्यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.
लवकरात लवकर मंदिर व्हावं
दरम्यान, राम मंदिराचा निर्णय लवकरात लवकर आला पाहिजे. राम मंदिरावरचा निर्णय उशिरा यावा, असं देशातील कोणत्याही व्यक्तिला वाटत नसेल. वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय काहीच होऊ शकत नाही. तिथली परिस्थितीच तशी आहे, असंही त्या म्हणाल्या. माझ्या मनात आलं तर उद्या जाऊन वादग्रस्त जागेवर भव्य राम मंदिर बांधेन. पण मर्यादा आणि नियमांनी मी बांधली गेलेली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.