नवी दिल्ली : केंद्र सरकारनं १४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस दिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवशी सर्व केंद्रीय कार्यालयांचं कामकाज बंद राहणार आहे. सरकारनं या संदर्भात घेतलेल्या निर्णयासंबंधी सर्व मंत्रालयांना एक मेमोरेंडम जारी केलंय. यामध्ये आपापल्या विभागाला यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. १८९७ मध्ये आंबेडकरांचं कुटुंब मध्य प्रदेशातून मुंबईमध्ये दाखल झालं होतं. मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मॅट्रीकनंतर १९०७ साली एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश मिळवला. १९१२ साली मुंबई विद्यापिठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी मिळवली. वर्ष १९१३ मध्ये तीन वर्षांसाठी त्यांना ११.५० पाऊंड स्टर्लिंग प्रती महिन्याची बडोदा स्टेट स्कॉलरशीप मिळाली. याच स्कॉलरशीपच्या मदतीनं त्यांनी अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क स्थित कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवला. १९१५ साली त्यांनी मुख्य विषय अर्थशास्त्रासोबत समाजशास्त्र, इतिहास आणि मानवशास्त्रासोबत एमए पूर्ण केलं.
महिलांच्या शिक्षण आणि अधिकारांसाठी, समाजसुधारणेसाठी आणि दलितांना शोषणातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यासाठी ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचं गठण करण्यात आलं. समितीच्या १९ उपसमित्यांपैंकी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. २६ नोव्हेंबर रोजी घटना समितीने राज्यघटनेच्या सुधारित मसुद्याला मान्यता दिली आणि २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली.
६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत डॉ. आंबेडकर यांचं निधन झालं. १९९० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोपरांत 'भारतरत्न' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवशी सर्व केंद्रीय कार्यालयांचं कामकाज बंद राहणार आहे. सरकारनं या संदर्भात घेतलेल्या निर्णयासंबंधी सर्व मंत्रालयांना एक मेमोरेंडम जारी केलंय. यामध्ये आपापल्या विभागाला यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. १८९७ मध्ये आंबेडकरांचं कुटुंब मध्य प्रदेशातून मुंबईमध्ये दाखल झालं होतं. मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मॅट्रीकनंतर १९०७ साली एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश मिळवला. १९१२ साली मुंबई विद्यापिठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी मिळवली. वर्ष १९१३ मध्ये तीन वर्षांसाठी त्यांना ११.५० पाऊंड स्टर्लिंग प्रती महिन्याची बडोदा स्टेट स्कॉलरशीप मिळाली. याच स्कॉलरशीपच्या मदतीनं त्यांनी अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क स्थित कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवला. १९१५ साली त्यांनी मुख्य विषय अर्थशास्त्रासोबत समाजशास्त्र, इतिहास आणि मानवशास्त्रासोबत एमए पूर्ण केलं.
महिलांच्या शिक्षण आणि अधिकारांसाठी, समाजसुधारणेसाठी आणि दलितांना शोषणातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यासाठी ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचं गठण करण्यात आलं. समितीच्या १९ उपसमित्यांपैंकी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. २६ नोव्हेंबर रोजी घटना समितीने राज्यघटनेच्या सुधारित मसुद्याला मान्यता दिली आणि २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली.
६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत डॉ. आंबेडकर यांचं निधन झालं. १९९० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोपरांत 'भारतरत्न' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.