नवी दिल्ली: देशात करोना विषाणूचा संसर्ग तीव्र गतीने पसरत असताना मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक सामानांच्या यादीतून हटवण्यात आले आहेत. संकटाच्या या काळात या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून मास्क आणि सॅनिटायझर या वस्तू हटवू नयेत, अशी विनंती मास्क आणि सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपन्यांनी केंद्र सरकारला केली होती. मात्र केंद्र सरकारने या विनंतीची दखल घेतली नाही.
इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीने (AIMED) ग्राहक व्यवहार विभागात्या सचिवांना पत्र लिहिले होते. देशात करोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. अशात २-३ प्ले मास्क ही वस्तू पुढील ६ महिन्यांसाठी अत्यावश्यक सामानाच्या यादीत ठेवायला हवे, असे या पत्रात लिहिण्यात आले होते. मात्र सॅनिटायझरसंदर्भात आढावा घेण्यात यावा असे सूचवण्यात आले होते.
मात्र, हा सल्ला बाजूला सारत जुलैला सरकारने नवी यादी जारी केली. यात सॅनिटायझर आणि मास्कचा समावेश नव्हता. देशात अनलॉक-१ सुरू झाल्यापासून लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. अशात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढत आहे, असे AIMED ने ३० जुलैला म्हटले होते.
वाचा- Live: देशातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ७,४२,४१७ वर
AIMED ने या वस्तूंच्या किमतींवर कॅप लावण्याबाबतही सरकारला सूचित केले होते. मात्र, आता या वस्तू अत्यावश्यक सामानाच्या यादीतूनच वगळण्यात आल्याने मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती वाढण्याचा धोका आहे. मात्र, पुढील एका वर्षासाठी १० टक्क्यांहून अधिक प्रमाणात किंमती वाढवल्या जाऊ शकणार नाहीत.
वाचा: 'भारतात पुरेशा चाचण्या होत नाहीए, रुग्णसंख्या वाढण्याची भीती?'
दरम्यान, आता देशात मास्क आणि सॅनिटायझरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्या गेल्या तरी फारसा फरक पडणार नसल्याचे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. देशात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी अचानक वाढली होती. हे पाहून सरकारने या वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत केला होता. त्या वेळी १०० मीलीच्या सॅनिटायझरची किंमत १०० रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये असे सांगण्यात आले होते. अत्यावश्यक सामानाच्या यादीत वस्तूंचा समावेश झाल्यानंतर या वस्तूंच्या काळ्याबाजारावर अंकुश बसत असतो.
वाचा: धक्कादायक! कुत्रा खात होता करोनाग्रस्ताचे अर्धवट जळालेले शव
इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीने (AIMED) ग्राहक व्यवहार विभागात्या सचिवांना पत्र लिहिले होते. देशात करोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. अशात २-३ प्ले मास्क ही वस्तू पुढील ६ महिन्यांसाठी अत्यावश्यक सामानाच्या यादीत ठेवायला हवे, असे या पत्रात लिहिण्यात आले होते. मात्र सॅनिटायझरसंदर्भात आढावा घेण्यात यावा असे सूचवण्यात आले होते.
मात्र, हा सल्ला बाजूला सारत जुलैला सरकारने नवी यादी जारी केली. यात सॅनिटायझर आणि मास्कचा समावेश नव्हता. देशात अनलॉक-१ सुरू झाल्यापासून लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. अशात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढत आहे, असे AIMED ने ३० जुलैला म्हटले होते.
वाचा- Live: देशातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ७,४२,४१७ वर
AIMED ने या वस्तूंच्या किमतींवर कॅप लावण्याबाबतही सरकारला सूचित केले होते. मात्र, आता या वस्तू अत्यावश्यक सामानाच्या यादीतूनच वगळण्यात आल्याने मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती वाढण्याचा धोका आहे. मात्र, पुढील एका वर्षासाठी १० टक्क्यांहून अधिक प्रमाणात किंमती वाढवल्या जाऊ शकणार नाहीत.
वाचा: 'भारतात पुरेशा चाचण्या होत नाहीए, रुग्णसंख्या वाढण्याची भीती?'
दरम्यान, आता देशात मास्क आणि सॅनिटायझरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्या गेल्या तरी फारसा फरक पडणार नसल्याचे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. देशात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी अचानक वाढली होती. हे पाहून सरकारने या वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत केला होता. त्या वेळी १०० मीलीच्या सॅनिटायझरची किंमत १०० रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये असे सांगण्यात आले होते. अत्यावश्यक सामानाच्या यादीत वस्तूंचा समावेश झाल्यानंतर या वस्तूंच्या काळ्याबाजारावर अंकुश बसत असतो.
वाचा: धक्कादायक! कुत्रा खात होता करोनाग्रस्ताचे अर्धवट जळालेले शव