यवतमाळ
'जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे विधेयक आणणार आहे', अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलीय. यवतमाळ येथे नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना अहीर यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मुले पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात नाथजोगी समाजाच्या ५ जणांची जमावाने हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांची भेट घेतली.
या प्रस्तावित विधेयकात १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात दोषी सिद्ध झालेल्यास देखील फाशीच्या शिक्षेची तरतूद असेल असेही अहीर यांनी या विधेयकाबाबत अधिक माहिती देताना सांगितले.
जमावाकडू होणाऱ्या हत्या (मॉब लिंचिंग) हा रानटी गुन्हा असून कोणताही सुसंस्कृत समाज या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, असे सांगत केंद्र सरकार असे गुन्हे रोखण्यासाठी लवकरच प्रस्तावित विधेयक आणणार असल्याचे अहीर म्हणाले.
देशाच्या विविध भागांमध्ये गायीची सत्करी करण्याच्या संशयावरून, तसेच मुले पळवण्याच्या संशयावरून जमावाकडून झालेल्या हत्यांच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकार काय पावले उचलणार याबाबत माहिती देताना अहीर यांनी प्रस्तावित विधेयकाबद्दल माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील भटक्या जमातीत येणाऱ्या नाथजोगी समाजाच्या ५ जणांची धुळे जिल्ह्यात जमावाकडून हत्या करण्यात आली होती. हे ५ जण मुले पळवणारे असावेत असा संशय आल्याने जमावाने त्यांना जीवे मारले होते. या घटनेनंतर या समाजात दहशतीचे वातावरण पसरले होते.
घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करताना अहीर यांनी हे प्रकरण राज्य सरकार, तसेच केंद्र सरकारने गांभीर्याने घेतल्याचे सांगितले. शिक्षणाचा हक्क कायदा असतानाही नाथजोगी समाजातील मुले शिक्षणापासून वंचित असल्याची कैफियत समाजाच्या प्रतिनिधींनी अहीर यांच्यापुढे मांडली. यावेळी या प्रतिनिधींनी नाथजोगी समाजासाठीच्या घरांच्या प्रश्नासह कसण्यासाठी जमीन, आरोग्याच्या सुविधा आणि तरुणांना रोजगार आणि सुरक्षा पुरवण्यात यावी अशा मागण्या केल्या.
'जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे विधेयक आणणार आहे', अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलीय. यवतमाळ येथे नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना अहीर यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मुले पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात नाथजोगी समाजाच्या ५ जणांची जमावाने हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांची भेट घेतली.
या प्रस्तावित विधेयकात १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात दोषी सिद्ध झालेल्यास देखील फाशीच्या शिक्षेची तरतूद असेल असेही अहीर यांनी या विधेयकाबाबत अधिक माहिती देताना सांगितले.
जमावाकडू होणाऱ्या हत्या (मॉब लिंचिंग) हा रानटी गुन्हा असून कोणताही सुसंस्कृत समाज या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, असे सांगत केंद्र सरकार असे गुन्हे रोखण्यासाठी लवकरच प्रस्तावित विधेयक आणणार असल्याचे अहीर म्हणाले.
देशाच्या विविध भागांमध्ये गायीची सत्करी करण्याच्या संशयावरून, तसेच मुले पळवण्याच्या संशयावरून जमावाकडून झालेल्या हत्यांच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकार काय पावले उचलणार याबाबत माहिती देताना अहीर यांनी प्रस्तावित विधेयकाबद्दल माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील भटक्या जमातीत येणाऱ्या नाथजोगी समाजाच्या ५ जणांची धुळे जिल्ह्यात जमावाकडून हत्या करण्यात आली होती. हे ५ जण मुले पळवणारे असावेत असा संशय आल्याने जमावाने त्यांना जीवे मारले होते. या घटनेनंतर या समाजात दहशतीचे वातावरण पसरले होते.
घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करताना अहीर यांनी हे प्रकरण राज्य सरकार, तसेच केंद्र सरकारने गांभीर्याने घेतल्याचे सांगितले. शिक्षणाचा हक्क कायदा असतानाही नाथजोगी समाजातील मुले शिक्षणापासून वंचित असल्याची कैफियत समाजाच्या प्रतिनिधींनी अहीर यांच्यापुढे मांडली. यावेळी या प्रतिनिधींनी नाथजोगी समाजासाठीच्या घरांच्या प्रश्नासह कसण्यासाठी जमीन, आरोग्याच्या सुविधा आणि तरुणांना रोजगार आणि सुरक्षा पुरवण्यात यावी अशा मागण्या केल्या.