अ‍ॅपशहर

uttarakhand glacier burst : उत्तराखंड दुर्घटना; चमोलीतील ते बेपत्ता १३६ जण अखेर मृत घोषित

उत्तराखंडमध्ये चमोलीत ग्लेशियर कोसळून मोठी दुर्घटना झाली. यात मोठी जीवितहानी झाली आहे. या घटनेला १७ दिवस झाले. आता या घटनेतील बेपत्ता १३६ जणांना सरकारने मृत घोषित केलं आहे. यामुळे मृतांची संख्या आता २०६ वर गेली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2021, 8:44 pm
नवी दिल्लीः ग्लेशियर कोसळून झालेल्या उत्तराखंडमधील दुर्घटनेत चमोली ( chamoli glacier burst ) येथील १३६ जण बेपत्ता झाले. आता राज्य सरकारने या सर्व बेपत्ता ( missing to be declared dead ) नागरिकांना मृत घोषित केलं आहे. उत्तराखंड सरकारने ( Uttarakhand glacier burst ) मंगळवारी याबाबतचे आदेश दिले. सरकारने बेपत्ता नागरिकांना मृत घोषित केल्यानंतर दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांची एकूण संख्या २०६ वर गेली आहे. दुर्घटनेच्या आजच्या १७ व्या दिवसापर्यंत ७० जणांचे मृतदेह आणि २९ मानवी अवयव सापडले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chamoli glacier burst
उत्तराखंड दुर्घटना; चमोलीतील ते बेपत्ता १३६ जण अखेर मृत घोषित


चमोली आणि आजूबाजूच्या भागात सतत शोध सुरू आहे. मोठ्या संख्येने नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत. तर काहींचा वाचवण्यातही आलं आहे. असं असूनही ज्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही, त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

ऋषिगंगेवर तयार झालेल्या कृत्रिम तलावाचे तोंड रुंद केले

ग्लेशियर तुटून चामोलीतील रैनी गावाजवळ ऋषिगंगा नदीवर तयार झालेल्या कृत्रिम तलावापासून अजूनही मोठा धोका आहे. तलावाच्या छोट्या तोंडामुळे पाण्याचा प्रवाह कमी होत चालला होता. यामुळे तलाव फुटण्याचा धोका होता. आयटीबीपीच्या जवानांनी तलावाचे तोंड सुमारे १५ फूट रुंद केले आहे. पाणी साचल्यामुळे दबाव निर्माण झाला होता. तलावाचे तोंड रुंद करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती राज्य आपत्ती कृती दलाचे (SDRF) कमांडंट नवनीत भुल्लर यांनी दिली.

तलावामध्ये सुमारे ४.८० कोटी लिटर पाणी

भारतीय नौदल, हवाई दल आणि तज्ज्ञ पथकाने ऋषीगंगावरील तयार झालेल्या कृत्रिम तलावाची पाहणी केली. पाणबुड्यांद्वारे या तलावाची खोली मोजली गेली. या तलावामध्ये अंदाजे ४.८० कोटी लिटर पाणी आहे.

हा कृत्रिम तलाव सुमारे ७५० मीटर लांबीचा असून पुढे तो अरुंद होत गेला आहे. त्याची खोली आठ मीटर आहे. नौदलाच्या पाणबुड्यांनी हातातील प्रतिध्वनी लहरींद्वारे तलावाची खोली मोजली. हा तलाव फुटला तर यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते हा तलाव केदारनाथच्या चौराबाडीसारखी आहे. २०१३ मध्ये, केदारनाथच्या वरच्या भागातील २५० मीटर लांबीचा, १ १५० मीटर रुंद आणि सुमारे २० मीटर खोल तवाल फुटल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या तलावातून सेकंदाला सुमारे १७ हजार लिटर पाणी बाहेर येत होते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टूलकिट प्रकरण : पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला जामीन मंजूर

कृत्रिम तलावाच्या सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सेन्सर देखील लावण्यात आले आहेत. तसंच तज्ञांचे एक पथकही तैनात केले गेले आहे. याशिवाय ऋषीगंगा नदीतही सेन्सर्सही लावण्यात आले आहेत, ज्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढताच अलार्म वाजेल. एसडीआरएफने संपर्कासाठी येथे एक डिव्हाइस देखील बसवला आहे.

Gujarat Civic Body Polls : गुजरात महानगरपालिका निवडणुकीत भाजप आघाडीवर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज