कोरिया (छत्तीसगड): 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-२ मोहीमेचे उद्घाटन केले आणि ही मोहीम फसली. यापूर्वीच्या सरकारचे हे काम नव्हते,' असे विधान छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारमधील अन्न मंत्री अमरजीत भगत यांनी केले आहे. ते म्हणाले, ' आतापर्यंत मोदी हे काँग्रेस सरकारने केलेल्या कामांची उद्घाटने करीत होते आणि फीत कापत होते. पहिल्यांदाच ते चांद्रयान-२च्या प्रक्षेपणासाठी गेले आणि ते अयशस्वी झाले.' दरम्यान, भगत यांनी याप्रकरणी खुलासा केला असून, 'मला 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. मला त्यांनी जे यश मिळवले आहे त्याचा अपमान करायचा नव्हता,' असे म्हटले आहे.
मोदींमुळेच चांद्रयान फसले
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-२ मोहीमेचे उद्घाटन केले आणि ही मोहीम फसली. यापूर्वीच्या सरकारचे हे काम नव्हते,' असे विधान छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारमधील अन्न मंत्री अमरजीत भगत यांनी केले आहे.
Maharashtra Times 11 Sep 2019, 2:00 am