वृत्तसंस्था, अट्टारी
भारत-पाकिस्तान सीमारेषा चुकून ओलांडून पाक सैनिकांच्या तावडीत सापडलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण अखेर शनिवारी मायदेशी परतले. २९ सप्टेंबरपासून पाकच्या ताब्यात असलेल्या चव्हाण यांना दुपारी तीन वाजता वाघा बॉर्डरवर भारतीय लष्कराकडे सोपवण्यात आले. ही सुटका देशवासीयांसाठी सुखद धक्का असून केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीचे हे मोठे यश मानले जात आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल हल्ल्यांनंतर, ३७ राष्ट्रीय रायफल्सचे चंदू चव्हाण चुकून पाकच्या हद्दीत गेले होते. ते धुळ्याचे असल्याचे कळताच महाराष्ट्रातील नागरिकांना धक्काच बसला होता. बेभरवशी पाकिस्तान काय करेल याचा नेम नसल्याने चव्हाण कुटुंबीय तर खूपच चिंतेत होते. चंदूंच्या आजीचा तर या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी सरकार दरबारी धाव घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. चंदू चव्हाण यांना सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यावेळी केंद्र सरकारने दिली होती. अखेर, साडेतीन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर सरकारच्या प्रयत्नांना यश आले आले आहे.
चव्हाण यांच्या सुटकेसाठी पाकशी डीजीएमओ स्तरावर जवळपास १५ ते २० वेळा चर्चा झाल्या, पण पाककडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे केंद्रीय अधिकारी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा मांडत होते. ती मात्रा अचूक लागू पडली आणि गेल्याच आठवड्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी चव्हाण यांना सोडण्याचे आश्वासन पाकने दिल्याची खूषखबर दिली. दरम्यान, चंदू चव्हाण यांच्या सुटकेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.
आजीच्या अस्थींचे विसर्जन करणार
धुळेः चंदू चव्हाण यांच्याविषयीची बातमी कळताच त्यांच्या आजी लिलाबाई चिंधा पाटील यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला होता. चंदूची सुटका होईपर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन न करण्याचे कुटुंबीयांनी ठरवले होते. मात्र, आता त्या विसर्जित केल्या जातील, असे लष्करात असलेले चंदूंचे भाऊ भूषण चव्हाण यांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भारतीय डीजीएमओ, केंद्र सरकार आणि पाकिस्तान सरकार यांचा आभारी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
भारत-पाकिस्तान सीमारेषा चुकून ओलांडून पाक सैनिकांच्या तावडीत सापडलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण अखेर शनिवारी मायदेशी परतले. २९ सप्टेंबरपासून पाकच्या ताब्यात असलेल्या चव्हाण यांना दुपारी तीन वाजता वाघा बॉर्डरवर भारतीय लष्कराकडे सोपवण्यात आले. ही सुटका देशवासीयांसाठी सुखद धक्का असून केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीचे हे मोठे यश मानले जात आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल हल्ल्यांनंतर, ३७ राष्ट्रीय रायफल्सचे चंदू चव्हाण चुकून पाकच्या हद्दीत गेले होते. ते धुळ्याचे असल्याचे कळताच महाराष्ट्रातील नागरिकांना धक्काच बसला होता. बेभरवशी पाकिस्तान काय करेल याचा नेम नसल्याने चव्हाण कुटुंबीय तर खूपच चिंतेत होते. चंदूंच्या आजीचा तर या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी सरकार दरबारी धाव घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. चंदू चव्हाण यांना सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यावेळी केंद्र सरकारने दिली होती. अखेर, साडेतीन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर सरकारच्या प्रयत्नांना यश आले आले आहे.
चव्हाण यांच्या सुटकेसाठी पाकशी डीजीएमओ स्तरावर जवळपास १५ ते २० वेळा चर्चा झाल्या, पण पाककडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे केंद्रीय अधिकारी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा मांडत होते. ती मात्रा अचूक लागू पडली आणि गेल्याच आठवड्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी चव्हाण यांना सोडण्याचे आश्वासन पाकने दिल्याची खूषखबर दिली. दरम्यान, चंदू चव्हाण यांच्या सुटकेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.
आजीच्या अस्थींचे विसर्जन करणार
धुळेः चंदू चव्हाण यांच्याविषयीची बातमी कळताच त्यांच्या आजी लिलाबाई चिंधा पाटील यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला होता. चंदूची सुटका होईपर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन न करण्याचे कुटुंबीयांनी ठरवले होते. मात्र, आता त्या विसर्जित केल्या जातील, असे लष्करात असलेले चंदूंचे भाऊ भूषण चव्हाण यांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भारतीय डीजीएमओ, केंद्र सरकार आणि पाकिस्तान सरकार यांचा आभारी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.