अ‍ॅपशहर

‘भारत माता की जय’ म्हणायची जबरदस्ती नको!

'भारत माता की जय' ही घोषणा आतून उत्स्फूर्तपणे यायला हवी, ते म्हणायची कुणावरही सक्ती किंवा जबरदस्ती करायची गरज नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडली. त्यामुळे आता ओवेसी काय करतात, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Maharashtra Times 28 Mar 2016, 9:02 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनौ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chanting of bharat mata ki jai cant be forced on others rss chief
‘भारत माता की जय’ म्हणायची जबरदस्ती नको!


'भारत माता की जय' ही घोषणा आतून उत्स्फूर्तपणे यायला हवी, ते म्हणायची कुणावरही सक्ती किंवा जबरदस्ती करायची गरज नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडली. आपण असा भारत घडवू की तो पाहून नागरिक स्वतःहून 'भारत माता की जय' म्हणतील, असं आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केलं.

नव्या पिढीला 'भारत माता की जय' म्हणायला शिकवण्याची वेळ आली आहे, अशी खंत मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी खंत व्यक्त केली होती. परंतु, त्यांच्या या विधानावरून भलतंच महाभारत घडलं. मानेवर सुरा ठेवला तरी 'भारत माता की जय' म्हणणार नाही, असा पवित्रा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत गदारोळ झाला. आजही त्यावरून शाब्दिक चकमकी सुरू असताना, भागवत यांनी या विषयाबाबतची संघाची भूमिका थोडी सौम्य केली आहे.

लखनौमध्ये भारतीय किसान संघाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, लोकार्पण करताना भागवत म्हणाले की, आपल्याला असा श्रेष्ठ भारत निर्माण करायचाय, जो पाहून नागरिक स्वतःहून 'भारत माता की जय' म्हणतील. त्यासाठी कुणावर जबरदस्ती करायची गरज नाही. ही घोषणा मनातून ओठांवर आली पाहिजे, राष्ट्रवादाच्या घोषणा स्वेच्छेनं दिल्या गेल्या पाहिजेत. श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी अधिकाधिक लोकांना जोडणं हेच संघाचं उद्दिष्ट आहे.

संपूर्ण जगाने भारत माता की जय म्हणावं, अशी आमची इच्छा आहे, असं विधान मोहन भागवत यांनी रविवारी कोलकात्यात केलं होतं. त्यापाठोपाठ त्यांनी आज या विषयाबाबत सौम्य सूर लावला. त्यामुळे आता ओवेसी काय करतात, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज