कोलकाता : भारत सरकारकडून ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्यात आल्यानंतर आणि हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत. हीच भारताची चीनविरुद्ध 'डिजिटल स्ट्राईक' असल्याचं केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय. रविशंकर प्रसाद हे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एका रॅलीला संबोधित करताना बोलत होते. 'आम्ही देशवासियांचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी चिनी अॅपवर बंदी घातली. ही एक डिजिटल स्ट्राईक आहे' असं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी म्हटलंय.
'भारताला शांतता हवीय, परंतु जर कुणी वाईट नजर टाकली तर आम्ही त्याला प्रत्यूत्तर देणारच' असं भारत चीन तणावाबद्दल बोलताना रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.
वाचा : मोदी चीनवर बोलायला विसरले वाटतं, काँग्रेसचा पंतप्रधानांवर पुन्हा निशाणा
वाचा : 'तू इधर उधर की बात न कर...'; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
चीनला फटका बसण्याची शक्यता
भारत सरकारनं बंदी घातलेल्या अॅपमध्ये TikTok, Shareit, UC Browser, DU battery saver, Helo, Likee, WeChat, UC News, BigoLive आणि Vigo Video या अॅपचाही समावेश आहे.
चिनी वर्तमानपत्रांनी, भारतानं उचललेल्या या वादावर भाष्य करताना चीनला मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केलीय. यामुळे, एकट्या 'टिकटॉक' निर्माता 'बाईटडान्स' या चिनी कंपनीला तब्बल सहा बिलियन डॉलरचं नुकसान झाल्याचं 'ग्लोबल टाईम्स'नं म्हटलंय.
पंतप्रधानांचं थेट चीनवर कोणतंही वक्तव्य नाही
उल्लेखनीय म्हणजे, भारत चीन तणावा दरम्यान चिनी अॅपवर बंदी घालताना, युझर्सच्या डाटा चोरीची शक्यतेमुळे चीनच्या या अॅपमुळे १३० कोटी भारतीयांच्या सुरक्षेला धोका असल्याचं भारत सरकारकडून सांगण्यात आलं होतं. यामुळे भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि एकतेला धोका आहे. चीनच्या या अॅपद्वारे अवैध पद्धतीनं युझर्सचा डाटा चोरी करून भारताच्या बाहेरील सर्व्हरवर हा पाठवला जात असल्याचंही केंद्राकडून म्हटलं गेलं होतं. परंतु, उल्लेखनीय म्हणजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही' असं वक्तव्य केलेलं होतं. यानंतरही पंतप्रधान मोदींनी थेट चीनवर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
वाचा : मोदींच्या संबोधनापूर्वी राहुल गांधीचा व्हिडिओ; विचारले 'हे' प्रश्नवाचा : 'मोदी विरुद्ध मनमोहन'; चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधीनी काढले 'हे' अस्त्र
वाचा : जवानांप्रती कृतज्ञ पण 'प्रचाराचं टूल' शेअर करू नका, उमर अब्दुल्लांचं आवाहन
'भारताला शांतता हवीय, परंतु जर कुणी वाईट नजर टाकली तर आम्ही त्याला प्रत्यूत्तर देणारच' असं भारत चीन तणावाबद्दल बोलताना रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.
वाचा : मोदी चीनवर बोलायला विसरले वाटतं, काँग्रेसचा पंतप्रधानांवर पुन्हा निशाणा
वाचा : 'तू इधर उधर की बात न कर...'; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
चीनला फटका बसण्याची शक्यता
भारत सरकारनं बंदी घातलेल्या अॅपमध्ये TikTok, Shareit, UC Browser, DU battery saver, Helo, Likee, WeChat, UC News, BigoLive आणि Vigo Video या अॅपचाही समावेश आहे.
चिनी वर्तमानपत्रांनी, भारतानं उचललेल्या या वादावर भाष्य करताना चीनला मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केलीय. यामुळे, एकट्या 'टिकटॉक' निर्माता 'बाईटडान्स' या चिनी कंपनीला तब्बल सहा बिलियन डॉलरचं नुकसान झाल्याचं 'ग्लोबल टाईम्स'नं म्हटलंय.
पंतप्रधानांचं थेट चीनवर कोणतंही वक्तव्य नाही
उल्लेखनीय म्हणजे, भारत चीन तणावा दरम्यान चिनी अॅपवर बंदी घालताना, युझर्सच्या डाटा चोरीची शक्यतेमुळे चीनच्या या अॅपमुळे १३० कोटी भारतीयांच्या सुरक्षेला धोका असल्याचं भारत सरकारकडून सांगण्यात आलं होतं. यामुळे भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि एकतेला धोका आहे. चीनच्या या अॅपद्वारे अवैध पद्धतीनं युझर्सचा डाटा चोरी करून भारताच्या बाहेरील सर्व्हरवर हा पाठवला जात असल्याचंही केंद्राकडून म्हटलं गेलं होतं. परंतु, उल्लेखनीय म्हणजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही' असं वक्तव्य केलेलं होतं. यानंतरही पंतप्रधान मोदींनी थेट चीनवर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
वाचा : मोदींच्या संबोधनापूर्वी राहुल गांधीचा व्हिडिओ; विचारले 'हे' प्रश्नवाचा : 'मोदी विरुद्ध मनमोहन'; चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधीनी काढले 'हे' अस्त्र
वाचा : जवानांप्रती कृतज्ञ पण 'प्रचाराचं टूल' शेअर करू नका, उमर अब्दुल्लांचं आवाहन