वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रामधील आपले अस्तित्व वाढवण्याच्या भारतीय नौदल प्रयत्नात असतानाच चीनच्या हॅकरकडून ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस विक्रमादित्य’ या भारताच्या विमानवाहू युद्धनौकांवर नजर ठेवली जात असल्याची भीती सायबर सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एका राष्ट्रीय वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. विशेषतः दक्षिण चीन समुद्रामध्ये भारतीय विमानवाहू नौकांच्या हालचालींवर हॅकरचे लक्ष असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या हॅकरकडून सायबर सुरक्षा कोड हॅक करून भारतीय लष्कराच्या तयारीची माहिती चोरण्याचाही प्रयत्न होत असल्याचे तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘फर्मफायर आय’ या सायबर सुरक्षा संस्थेने या विषयी अहवाल तयार केला आहे. त्यात म्हटले आहे, ‘भारत-चीन सीमावाद व तिबेटची संघटना या विषयीची माहिती चोरण्यासाठी चीनच्या हॅकरकडून महत्त्वाच्या भारतीय संघटनांना लक्ष्य केले जात आहे.’ एपीटी-३० या नावाने कार्यरत असलेला हॅकरचा गट हा सर्वांत जुना गट असून त्याने सरकारी नेटवर्कमध्ये प्रवेश केल्याचा संशय ‘फायरआय’ संस्थेने व्यक्त केला आहे. चीनने यापूर्वीही तिबेटच्या संघटनांवर हेरगिरी केल्याचे उघडकीस आले होते. चीनने मात्र या आरोपांचा नेहमीच इन्कार केला आहे.
हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रामधील आपले अस्तित्व वाढवण्याच्या भारतीय नौदल प्रयत्नात असतानाच चीनच्या हॅकरकडून ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस विक्रमादित्य’ या भारताच्या विमानवाहू युद्धनौकांवर नजर ठेवली जात असल्याची भीती सायबर सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एका राष्ट्रीय वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. विशेषतः दक्षिण चीन समुद्रामध्ये भारतीय विमानवाहू नौकांच्या हालचालींवर हॅकरचे लक्ष असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या हॅकरकडून सायबर सुरक्षा कोड हॅक करून भारतीय लष्कराच्या तयारीची माहिती चोरण्याचाही प्रयत्न होत असल्याचे तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘फर्मफायर आय’ या सायबर सुरक्षा संस्थेने या विषयी अहवाल तयार केला आहे. त्यात म्हटले आहे, ‘भारत-चीन सीमावाद व तिबेटची संघटना या विषयीची माहिती चोरण्यासाठी चीनच्या हॅकरकडून महत्त्वाच्या भारतीय संघटनांना लक्ष्य केले जात आहे.’ एपीटी-३० या नावाने कार्यरत असलेला हॅकरचा गट हा सर्वांत जुना गट असून त्याने सरकारी नेटवर्कमध्ये प्रवेश केल्याचा संशय ‘फायरआय’ संस्थेने व्यक्त केला आहे. चीनने यापूर्वीही तिबेटच्या संघटनांवर हेरगिरी केल्याचे उघडकीस आले होते. चीनने मात्र या आरोपांचा नेहमीच इन्कार केला आहे.