म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कलम ३७० रद्द झाल्यापासून काश्मिरी मुलींविषयी बोलताना भाजप नेत्यांचा तोल ढळू लागला असून आता त्यात हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजपचे राज्यसभेचे सदस्य विजय गोयलही सामील झाले आहेत. भाजपच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा सर्वत्र तीव्र निषेध होतो आहे. 'आता हरयाणाचे लोकही काश्मिरी सून आणू शकतात', असे विधान खट्टर यांनी केले आहे, तर विजय गोयल यांनी आपल्या बंगल्याबाहेर काश्मिरी मुलीचे पोस्टर लावताना, कलम ३७० गेल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरल्याची टिप्पणी केली आहे.
फरीदाबादमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री खट्टर यांनी वादग्रस्त विधान केले. 'बिहारी सून आणणार, असे आमचे मंत्री ओ. पी. धनखड म्हणायचे. पण, आता काश्मीरचा मार्ग प्रशस्त झाला आहे. आम्ही काश्मिरी सून आणणार, असे आजकाल लोक म्हणू लागले आहेत', असे खट्टर म्हणाले. खट्टर यांच्या या विधानाचा चहुबाजूने तीव्र निषेध होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
दिल्लीच्या अशोक रोडवरील बंगल्याबाहेर विजय गोयल यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या छायाचित्रांसह काश्मिरी मुलीचे पोस्टर लावले असून, 'धारा ३७० का जाना, तेरा मुस्कुराना' अशी टिप्पणी केली आहे. या पोस्टरवर टीकेची झोड उठत असून हिंमत असेल तर गोयल यांनी पोस्टरवर आपल्या मुलीचा फोटो लावावा, असे आव्हान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी दिले आहे.
राहुल यांच्याकडून समाचार
'काश्मिरी महिलांविषयी खट्टर यांचे विधान घृणास्पद आहे. महिला पुरुषांची मालमत्ता नाही. कमकुवत मनाच्या, असुरक्षित आणि निराश व्यक्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षानुवर्षाच्या संस्काराचे काय परिणाम होऊ शकतात, हे खट्टर यांनी दाखवून दिले आहे', अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी खट्टर यांच्या विधानाचा समाचार घेतला.
खट्टर यांची सारवासारव
आपल्या विधानावरून वाद होताच खट्टर यांनी शनिवारी ट्विट करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या शुक्रवारच्या भाषणाचा पूर्ण व्हिडीओही त्यांनी शेअर केला. 'हरयाणातील मुले-मुलींच्या गुणोत्तराबाबतच्या मुद्द्याबाबत आपण बोलत होतो. माझ्या म्हणण्याचा मीडियाने विपर्यास करून माझी बदनामी चालवली असून, राहुल गांधींनी या अपप्रचाराला बळी पडू नये', असे खट्टर ट्विटमध्ये म्हणाले.
कलम ३७० रद्द झाल्यापासून काश्मिरी मुलींविषयी बोलताना भाजप नेत्यांचा तोल ढळू लागला असून आता त्यात हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजपचे राज्यसभेचे सदस्य विजय गोयलही सामील झाले आहेत. भाजपच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा सर्वत्र तीव्र निषेध होतो आहे. 'आता हरयाणाचे लोकही काश्मिरी सून आणू शकतात', असे विधान खट्टर यांनी केले आहे, तर विजय गोयल यांनी आपल्या बंगल्याबाहेर काश्मिरी मुलीचे पोस्टर लावताना, कलम ३७० गेल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरल्याची टिप्पणी केली आहे.
फरीदाबादमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री खट्टर यांनी वादग्रस्त विधान केले. 'बिहारी सून आणणार, असे आमचे मंत्री ओ. पी. धनखड म्हणायचे. पण, आता काश्मीरचा मार्ग प्रशस्त झाला आहे. आम्ही काश्मिरी सून आणणार, असे आजकाल लोक म्हणू लागले आहेत', असे खट्टर म्हणाले. खट्टर यांच्या या विधानाचा चहुबाजूने तीव्र निषेध होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
दिल्लीच्या अशोक रोडवरील बंगल्याबाहेर विजय गोयल यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या छायाचित्रांसह काश्मिरी मुलीचे पोस्टर लावले असून, 'धारा ३७० का जाना, तेरा मुस्कुराना' अशी टिप्पणी केली आहे. या पोस्टरवर टीकेची झोड उठत असून हिंमत असेल तर गोयल यांनी पोस्टरवर आपल्या मुलीचा फोटो लावावा, असे आव्हान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी दिले आहे.
राहुल यांच्याकडून समाचार
'काश्मिरी महिलांविषयी खट्टर यांचे विधान घृणास्पद आहे. महिला पुरुषांची मालमत्ता नाही. कमकुवत मनाच्या, असुरक्षित आणि निराश व्यक्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षानुवर्षाच्या संस्काराचे काय परिणाम होऊ शकतात, हे खट्टर यांनी दाखवून दिले आहे', अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी खट्टर यांच्या विधानाचा समाचार घेतला.
खट्टर यांची सारवासारव
आपल्या विधानावरून वाद होताच खट्टर यांनी शनिवारी ट्विट करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या शुक्रवारच्या भाषणाचा पूर्ण व्हिडीओही त्यांनी शेअर केला. 'हरयाणातील मुले-मुलींच्या गुणोत्तराबाबतच्या मुद्द्याबाबत आपण बोलत होतो. माझ्या म्हणण्याचा मीडियाने विपर्यास करून माझी बदनामी चालवली असून, राहुल गांधींनी या अपप्रचाराला बळी पडू नये', असे खट्टर ट्विटमध्ये म्हणाले.