रायबरेली : सत्ताधारी भाजपला भारतात पुन्हा एकदा 'कंपनीराज' आणायचे आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केला. 'कार्पोरेट' या गोंडस नावाखाली सरकारने देशातील महत्त्वाचे कारखाने आणि संस्थांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे, असेही प्रियांका पुढे म्हणाल्या.
रायबरेलीजवळील लालगंज येथील 'मॉडर्न रेल कोच फॅक्टरी'चं खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची आज प्रियांका यांनी भेट घेतली व आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना प्रियांका यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
कंपन्या, कारखाने, सरकारचे विविध उपक्रम, सार्वजनिक सेवा आणि विविध संस्थांचे खासगीकरण करण्याचा सपाटा भाजप सरकारने लावला असून या सरकारला देशात पुन्हा एकदा कंपनीराज आणायचे आहे, असेच यावरून दिसत असल्याची तोफ प्रियांका यांनी डागली.
रेल्वेचा भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. या उपक्रमातून करोडो रोजगारांची निर्मिती तर झालीच शिवाय देशाच्या एकतेचंही रेल्वे हे प्रतिक आहे. या सारख्या उपक्रमांचे खासगीकरण करून ते काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचेच हे कारस्थान आहे. याची सुरुवात रायबरेलीतून झाली आहे, असा आरोपही प्रियांका यांनी केला.
रायबरेलीजवळील लालगंज येथील 'मॉडर्न रेल कोच फॅक्टरी'चं खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची आज प्रियांका यांनी भेट घेतली व आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना प्रियांका यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
कंपन्या, कारखाने, सरकारचे विविध उपक्रम, सार्वजनिक सेवा आणि विविध संस्थांचे खासगीकरण करण्याचा सपाटा भाजप सरकारने लावला असून या सरकारला देशात पुन्हा एकदा कंपनीराज आणायचे आहे, असेच यावरून दिसत असल्याची तोफ प्रियांका यांनी डागली.
रेल्वेचा भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. या उपक्रमातून करोडो रोजगारांची निर्मिती तर झालीच शिवाय देशाच्या एकतेचंही रेल्वे हे प्रतिक आहे. या सारख्या उपक्रमांचे खासगीकरण करून ते काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचेच हे कारस्थान आहे. याची सुरुवात रायबरेलीतून झाली आहे, असा आरोपही प्रियांका यांनी केला.