अ‍ॅपशहर

चीनबाबत मोदी गप्प का? सीमा संघर्षाबाबत कॉंग्रेसचा केंद्र सरकारला प्रश्न

दोन वर्षांच्या प्रदीर्घ विरामानंतर तवांग येथील यांगत्से भागातील भारतीय चौक्या ताब्यात घेण्यासाठी चीनला कोणत्या गोष्टीमुळे चिथावणी मिळाली,’ असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. भारत जोडो यात्रेनंतर रमेश पत्रकार परिषदेत बोलत होते.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 19 Dec 2022, 9:33 am
दौसा (राजस्थान) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेवरील स्थितीबाबत संसदेत चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत,’ असा आरोप काँग्रेसकडून रविवारी करण्यात आला. ‘संरक्षणमंत्र्यांनी नव्हे, तर पंतप्रधानांनी या मुद्द्यावर उत्तर द्यायला हवे,’ असा आग्रह पक्षाने धरला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jairam ramesh
चीनबाबत मोदी गप्प का? सीमा संघर्षाबाबत कॉंग्रेसचा केंद्र सरकारला प्रश्न


भारत-चीन सीमा मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तरे देण्याची मागणी करण्याचा देशाचा हक्कही आहे, असे त्यांनी सांगितले. ‘पंतप्रधानांनी चीन हा शब्दही उच्चारलेला नाही. त्या देशासोबत जवळचे संबंध असल्यामुळे सरकार गप्प आहे का? दोन वर्षांच्या प्रदीर्घ विरामानंतर तवांग येथील यांगत्से भागातील भारतीय चौक्या ताब्यात घेण्यासाठी चीनला कोणत्या गोष्टीमुळे चिथावणी मिळाली,’ असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. भारत जोडो यात्रेनंतर रमेश पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘भाजप १९६२च्या युद्धाचा मुद्दा उपस्थित करतो; परंतु १९६७चे युद्ध ते विसरतात. चीन-भारत यांच्या या युद्धात चीनचा पराभव झाला आणि भारत जिंकला. हादेखील इतिहासाचा भाग आहे,’ असेही रमेश यांनी नमूद केले.

१९८६मध्ये सुमदोरोंग चू येथे झालेल्या संघर्षादरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी तेथे सैन्य तैनात केल्यापासून भारताचे यांगत्से क्षेत्रात वर्चस्व होते. चीनने नवीन आघाडी उघडण्याचे धाडस कसे केले? - जयराम रमेश, प्रवक्ते, काँग्रेस

चीनमधून आयातीस परवानगी का?

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या मुद्द्यावरून रविवारी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. देशाच्या सैनिकांसाठी काही धैर्य आणि आदर दाखवावा, असे ते म्हणाले. ते पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत बोलत होते. ‘सीमेवर चीनची आक्रमकता वाढत असताना भाजपशासित केंद्र सरकार सर्व काही ठीक असल्याचे सांगते. चीनला शिक्षा देण्याऐवजी, मोदी सरकार या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करण्यास परवानगी देऊन चीनला बक्षीस देत आहे. तर अनेक भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याशी लढताना आपले प्राण पणाला लावले,’ असे केजरीवाल यांनी सांगितले.

महत्वाचे लेख