अ‍ॅपशहर

'अच्छे दिनचं स्वप्न' दाखवून देशाची फसवणूक'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून अच्छे दिनचं स्वप्न दाखवून सरकारने देशाची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने आज केला.

Maharashtra Times 16 May 2017, 1:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress attack bjp over acche din
'अच्छे दिनचं स्वप्न' दाखवून देशाची फसवणूक'


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून अच्छे दिनचं स्वप्न दाखवून सरकारने देशाची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने आज केला.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आर. एस. सुरजेवाला आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. आजकाल कोणी असहिष्णुतेवर साधी चर्चा जरी केली तरी त्याला देशद्रोही ठरवले जाते, अशी टीका ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. सीमेवर कोणताही दहशवादी हल्ला होतो. तेंव्हा पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ असं पालूपद लावलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

तर शेतकरी हवालदिल झालेला असताना त्यांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप भावनिक मुद्दयांना हात घालत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या घरावर छापे मारल्याने काँग्रेस घाबरून जाईल या भ्रमात राहू नका, असा इशारा सुरजेवाला यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज