मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
रामराज्याची संकल्पना आमचीच आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला रामराज्य म्हणता येणार नाही. त्याला केवळ आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) राज्यच म्हणता येईल, अशी टीका करतानाच रामराज्य आणि आरएसएस राज्यात खूपच फरक असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने काँग्रेसने पक्षाच्या संकेतस्थळावर एक लेख प्रसिद्ध करून भाजप आणि संघावर जोरदार हल्ला चढविला आहे. ते भगवान राम यांच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांना पुढे नेण्याऐवजी व्यक्तिपूजा करून पदांचं अवमुल्यन करत आहेत. भगवान रामाच्या राज्यात सर्वांच्या श्रद्धेचा सन्मान केला जायचा. पण मोदी सरकार आणि त्यांची एकुण कृती पाहता हे ते रामराज्य नसून आरएसएस राज्यच आहे. या आरएसएस राज्यात रामराज्याच्या आदर्शांचं पालन होताना दिसत नाही, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
महात्मा गांधी यांनी ज्या रामराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच्या उलट केंद्र सरकार आणि संघाचे धोरण आहे. रामराज्यात सर्व आनंदात होते. तिथे गुड गव्हर्नेंसची संस्कृती होती, असंही काँग्रेसने या लेखात नमूद केलं आहे. महात्मा गांधींना रामराज्य कशाप्रकारचं हवं होतं त्याचा हवाला या लेखात देण्यात आला आहे. 'रामराज्याचा अर्थ हिंदूंची सत्ता नव्हे. माझ्यासाठी राम आणि रहीम एकच असून दोन्ही एकच देवता आहेत. मी अन्य कोणत्याच देवतेला मानत नाही. मी केवळ सत्य आणि धर्मालाच ईश्वर मानतो. प्राचीनकालिन रामराज्य नि:संशयपणे उत्कृष्ट लोकशाहीचा आदर्श असून त्यात सर्वात खालच्या वर्गालाही न्याय मिळत होता', अशी महात्मा गांधींची रामराज्याची संकल्पना होती. या संकल्पनेशी सध्याच्या सरकारला काही घेणं-देणं नसल्याचंही या लेखात नमूद आहे.
We are reclaiming the concept of Ramrajya as Mahatma Gandhi’s secular and democratic idea of justice. Read more: https://t.co/FpO5JhKSNU pic.twitter.com/51UZ0xBLza — Congress (@INCIndia) September 30, 2017
प्रेशर कुकर सारखी परिस्थिती
या लेखात मोदींच्या आर्थिक धोरणांवरही काँग्रेसने हल्ला चढविला असून सध्याची परिस्थिती प्रेशर कुकर सारखी असल्याचं म्हटलं आहे. बेरोजगारी नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दररोज २९,५५० तरूणांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे, असं सांगतानाच भाजप सरकार धार्मिक भावना भडकवित असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. गोरक्षकांसारख्या धर्मांधांना सरकार मोकळं रान देत असून हे लोक बहुविविधता असणाऱ्या भारतात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
रामराज्याची संकल्पना आमचीच आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला रामराज्य म्हणता येणार नाही. त्याला केवळ आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) राज्यच म्हणता येईल, अशी टीका करतानाच रामराज्य आणि आरएसएस राज्यात खूपच फरक असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने काँग्रेसने पक्षाच्या संकेतस्थळावर एक लेख प्रसिद्ध करून भाजप आणि संघावर जोरदार हल्ला चढविला आहे. ते भगवान राम यांच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांना पुढे नेण्याऐवजी व्यक्तिपूजा करून पदांचं अवमुल्यन करत आहेत. भगवान रामाच्या राज्यात सर्वांच्या श्रद्धेचा सन्मान केला जायचा. पण मोदी सरकार आणि त्यांची एकुण कृती पाहता हे ते रामराज्य नसून आरएसएस राज्यच आहे. या आरएसएस राज्यात रामराज्याच्या आदर्शांचं पालन होताना दिसत नाही, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
महात्मा गांधी यांनी ज्या रामराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच्या उलट केंद्र सरकार आणि संघाचे धोरण आहे. रामराज्यात सर्व आनंदात होते. तिथे गुड गव्हर्नेंसची संस्कृती होती, असंही काँग्रेसने या लेखात नमूद केलं आहे. महात्मा गांधींना रामराज्य कशाप्रकारचं हवं होतं त्याचा हवाला या लेखात देण्यात आला आहे. 'रामराज्याचा अर्थ हिंदूंची सत्ता नव्हे. माझ्यासाठी राम आणि रहीम एकच असून दोन्ही एकच देवता आहेत. मी अन्य कोणत्याच देवतेला मानत नाही. मी केवळ सत्य आणि धर्मालाच ईश्वर मानतो. प्राचीनकालिन रामराज्य नि:संशयपणे उत्कृष्ट लोकशाहीचा आदर्श असून त्यात सर्वात खालच्या वर्गालाही न्याय मिळत होता', अशी महात्मा गांधींची रामराज्याची संकल्पना होती. या संकल्पनेशी सध्याच्या सरकारला काही घेणं-देणं नसल्याचंही या लेखात नमूद आहे.
We are reclaiming the concept of Ramrajya as Mahatma Gandhi’s secular and democratic idea of justice. Read more: https://t.co/FpO5JhKSNU pic.twitter.com/51UZ0xBLza — Congress (@INCIndia) September 30, 2017
प्रेशर कुकर सारखी परिस्थिती
या लेखात मोदींच्या आर्थिक धोरणांवरही काँग्रेसने हल्ला चढविला असून सध्याची परिस्थिती प्रेशर कुकर सारखी असल्याचं म्हटलं आहे. बेरोजगारी नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दररोज २९,५५० तरूणांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे, असं सांगतानाच भाजप सरकार धार्मिक भावना भडकवित असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. गोरक्षकांसारख्या धर्मांधांना सरकार मोकळं रान देत असून हे लोक बहुविविधता असणाऱ्या भारतात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.