नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत आहे. यापैकी पंजाब वगळता ४ राज्यांमध्ये आपली सत्ता राखण्यात भाजपला यश येताना दिसत आहे. पंजाबमध्ये भाजपची सत्ता होती. पण या निवडणुकीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा एक नव्हे तर दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव झाला आहे. एवढचं काय तर पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू ( Punjab Election Result ) यांनाही पराभवाचा सामना करावा लागतोय. ५ राज्यांच्या या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी ( rahul gandhi ) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव स्वीकारला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाचा पराभव त्यांनी स्वीकारला आहे. जनमताचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेचा कौल मिळवणाऱ्यांना शुभेच्छा आहेत. निवडणुकीसाठी झटलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचा आभारी आहे. या निवडणुकीतून आपण धडा घेऊया आणि जनतेच्या हितासाठी अशाच प्रकारे काम करूया, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
'अनपेक्षित निकाल', काँग्रेसने दिली प्रतिक्रिया
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी अनपेक्षित आहेत. जनतेचे आशीर्वाद मिळवण्यात अपयशी ठरल्याचे आम्ही मान्य करतो. पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
Sidhu होत आहेत ट्रेंड, लोकांनी लिहिलं- 'यावेळी जनतेनेच यांना ठोकलं'
भूमीपूत्र असलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांच्या माध्यमातून काँग्रेसने पंजाबला नवे नेतृत्व दिले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वातील ४.५ वर्षांच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात जनतेनेत सरकाविरोधात नकारात्म भावना होती. याचाच फटका निवडणुकीत बसला. आणि निवडणुकीत आम आदमी पक्षाला जनतेने कौल दिला, असे सुरजेवाला म्हणाले.
Arvind Kejriwal On Punjab Win: पंजाब जिंकताच 'आप'चे सर्वेसर्वा केजरीवाल यांचा संपूर्ण 'क्रांती'चा नारा; म्हणाले...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाचा पराभव त्यांनी स्वीकारला आहे. जनमताचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेचा कौल मिळवणाऱ्यांना शुभेच्छा आहेत. निवडणुकीसाठी झटलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचा आभारी आहे. या निवडणुकीतून आपण धडा घेऊया आणि जनतेच्या हितासाठी अशाच प्रकारे काम करूया, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
'अनपेक्षित निकाल', काँग्रेसने दिली प्रतिक्रिया
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी अनपेक्षित आहेत. जनतेचे आशीर्वाद मिळवण्यात अपयशी ठरल्याचे आम्ही मान्य करतो. पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
Sidhu होत आहेत ट्रेंड, लोकांनी लिहिलं- 'यावेळी जनतेनेच यांना ठोकलं'
भूमीपूत्र असलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांच्या माध्यमातून काँग्रेसने पंजाबला नवे नेतृत्व दिले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वातील ४.५ वर्षांच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात जनतेनेत सरकाविरोधात नकारात्म भावना होती. याचाच फटका निवडणुकीत बसला. आणि निवडणुकीत आम आदमी पक्षाला जनतेने कौल दिला, असे सुरजेवाला म्हणाले.
Arvind Kejriwal On Punjab Win: पंजाब जिंकताच 'आप'चे सर्वेसर्वा केजरीवाल यांचा संपूर्ण 'क्रांती'चा नारा; म्हणाले...