अ‍ॅपशहर

पैसे देऊन काश्मिरींना भेटताहेत डोवल: गुलाम नबी आझाद

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी भारत सरकारनं हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल स्वत: सर्वसामान्य काश्मिरींमध्ये मिसळत आहेत. शांततेसाठी सरकार करत असलेल्या या प्रयत्नांवर टीका करताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'पैसे देऊन काश्मिरींना सोबत घेतलं जात आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2019, 12:45 pm
श्रीनगर: कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी भारत सरकारनं हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल स्वत: सर्वसामान्य काश्मिरींमध्ये मिसळत आहेत. शांततेसाठी सरकार करत असलेल्या या प्रयत्नांवर टीका करताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'पैसे देऊन काश्मिरींना सोबत घेतलं जात आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress leader gulam nabi azad on ajit doval interacting with locals in shopian kashmir
पैसे देऊन काश्मिरींना भेटताहेत डोवल: गुलाम नबी आझाद


३७० कलम हटविण्याच्या व जम्मू-काश्मीरचं विभाजन करण्याच्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तेथील वातावरण लवकरात लवकर निवळून परिस्थिती पूर्वपदावर यावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. खुद्द अजित डोवल काश्मीरमध्ये ठाण मांडून आहेत. काल त्यांनी शोपियानमधील काही नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जेवणही घेतले. डोवल यांचे ते फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. याबाबत आझाद यांना विचारलं असता, 'पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता,' असं ते म्हणाले. 'काश्मीरमध्ये कर्फ्यू लावून कायदा बनवला गेला. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय,' असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज