अ‍ॅपशहर

'उत्तर-दक्षिण' वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर आणि दक्षिणेतील राजकारणावर भाष्य केलं. त्यावरून वाद सुरू झाला आहे. भाजपने राहुल गांधींवर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. तर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2021, 11:10 pm
नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी उत्तर व दक्षिण भारतातील राजकारणावर केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल ( kapil sibal ) यांनी सल्ला दिला आहे. मतदार कुठलेही असो, त्यांचा आदर केला पाहिजे. देशातील मतदारांच्या समजूतदारपणाचा आदर केला पाहिजे, मग ते कुठलेही असो, असं कपिल सिब्बल म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kapil Sibal
'उत्तर-दक्षिण' वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले...


'राहुल गांधी जे बोलले त्यावर मी काय बोलणार? कोणत्या संदर्भातून ते बोललेत हे तेच सांगू शकतील. पण आपण देशातील मतदारांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या समजूतदारपणाची बदनामी करू नये', असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

राहुल गांधींचे वक्तव्य हे देशाचे विभाजन करणारे आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपच्या टीकेलाही सिब्बल यांनी उत्तर दिलं आहे. 'कॉंग्रेस देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे, हे भाजपचं म्हणणं हास्यास्पद आहे. केंद्रात २०१४ पासून सत्तेत आल्यापासून समाजात फूट पाडण्याचं काम हे सरकार करत आलं आहे', अशी टीका त्यांनी केली.

rahul gandhi : राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावरून वाद; परराष्ट्रमंत्र्यांनी शिकवला 'भूगोल'!

तिरुवनंतपूरममधील एका सभेत राहुल गांधी यांनी उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकारण आणि मतदारांच्या समजूतदारपणावर बोट ठेवलं. 'पहिली १५ वर्षे मी उत्तर भारतात खासदार होतो. मी तेथील राजकारण बघितलं. पण केरळला आल्यावर मला एक वेगळा अनुभव आला. कारण येथील नागरिकांना राजकीय विषयांमध्ये रस आहे, तसंच मुद्द्यांच्या तपशीलात जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो', असं राहुल गांधी म्हणाले होते.

Puducherry : पुदुच्चेरीत राष्ट्रपती शासन लागू होणार?

अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव करणार्‍या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या वक्तव्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी हे 'एहसान फरामोश', असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केलीय.

महत्वाचे लेख