नवी दिल्ली: करोना विषाणूबाबत केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या एका ट्विटमुळे काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत. करोना विषाणूची दाहकता दाखवताना राहुल गांधी यांनी ट्विट केलेल्या एका फोटोत जम्मू आणि काश्मीर हा भाग पाकिस्तानात दाखवण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करणे सुरू झाले. यानंतर राहुल गांधींनी आपले ट्विट डिलिट करून टाकले.
राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'करोना विषाणू आमच्या लोकांसाठी आणि आमच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर स्वरुपाचा धोका आहे. मला वाटतं की हा विषय सरकार गांभिर्याने घेत नाही. योग्य वेळी पाऊल उचलणे गरजेचे आहे.'
राहुल यांच्या या ट्विटनंतर भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना जाब विचारला. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'ज्या नकाशात जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे दाखवण्यात आले आहे, अशा नकाशाचा आपण वारंवार वापर का करता?'. राहुल गांधींच्या ट्विटनंतर इतरही ट्विटर यूजर्सनी राहुल गांधीवर टीका करणे सुरू केले. काही वेळाने राहुल गांधी यांनी हे ट्विट डिलिट केले आणि एका बातमीसह दुसरे ट्विट केले.
राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'करोना विषाणू आमच्या लोकांसाठी आणि आमच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर स्वरुपाचा धोका आहे. मला वाटतं की हा विषय सरकार गांभिर्याने घेत नाही. योग्य वेळी पाऊल उचलणे गरजेचे आहे.'
राहुल यांच्या या ट्विटनंतर भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना जाब विचारला. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'ज्या नकाशात जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे दाखवण्यात आले आहे, अशा नकाशाचा आपण वारंवार वापर का करता?'. राहुल गांधींच्या ट्विटनंतर इतरही ट्विटर यूजर्सनी राहुल गांधीवर टीका करणे सुरू केले. काही वेळाने राहुल गांधी यांनी हे ट्विट डिलिट केले आणि एका बातमीसह दुसरे ट्विट केले.