नवी दिल्ली: 'सत्ताधाऱ्यांना अहंकार झाला आहे. त्यांच्यात गर्विष्ठपणा आला आहे. त्यांना वाटतं आम्ही सत्तेत आहोत तर कुणाचे ऐकण्याची गरज नाही. त्यांनी माणुसकीही सोडली आहे', असे तिखट शब्द वापरत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला व शेतकरी आंदोलनातील मृतांच्या वारसांना भरीव मदत मिळावी यासाठी दंड थोपटले. ( Rahul Gandhi Targets PM Modi ) वाचा: यूपीएत भूकंपाची शक्यता; राहुल गांधींवर नवा हल्ला, 'नेतृत्व हा काही दैवी...'
कृषी कायदे मागे घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. कायदे चुकीचे होते म्हणून त्यांना माफी मागावी लागली. असे असेल तर मग या कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करताना मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा विचार सरकारने करायला नको का?, असा बोचरा सवालच राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला. आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांचा तपशील उपलब्ध नसल्याने मदत देता येणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी त्यात काहीही तथ्य नाही. पंजाबमध्ये आमचे सरकार आहे. आमच्या सरकारने ४०३ मृत शेकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत दिली आहे. कुटुंबातील एका सदस्याला आम्ही नोकरीही देत आहोत. एकूण ५०० मृतांची अधिकृत यादी आमच्याकडे आहे. त्याशिवाय आणखी २०० शेतकरी मृत पावले आहेत. या सर्वांना केंद्राकडूनही मदत मिळाली पाहिजे. हा डेटा मी सोमवारी संसदेत मांडणार आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवून यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीच राहुल यांनी केली. शेतकरी आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन मिनिटं मौनही संसदेत पाळलं गेलं नाही. त्यावरून या सरकारची मानसिकता कळून येते, असेही राहुल म्हणाले.
वाचा: कृषी कायदे रद्द करताना चर्चा का टाळली?; राहुल गांधी यांनी केला 'हा' गंभीर आरोप
सरकारला मदत द्यायची नसली की कारणे सांगितली जातात. करोनाने मृत पावलेल्यांना मदत देण्याची मागणी झाली तेव्हाही डेटा उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले. आता शेतकऱ्यांच्या बाबतीतही तेच उत्तर सरकार देत आहे. हेच सरकार त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींचा फायदा होत असेल तर मात्र कोणताच पुरावा मागत नाही. ते काम झटपट केले जाते, असा गंभीर आरोपही राहुल यांनी केला. मोदींकडे फक्त त्यांच्या उद्योगपती मित्रांचे नंबर आहेत तर आमच्याकडे सर्व शहीद शेतकऱ्यांची नावे आणि नंबर आहेत. जर पंतप्रधानांना माफी मागायचीच असेल तर त्यांनी या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. फोन करून त्यांना धीर द्यावा, मदतीचा हात द्यावा, असे आवाहन राहुल यांनी केले.
वाचा: 'त्या' ५ ड्रग्ज केस वर्ग करा; NCBचं महाराष्ट्राच्या DGना पत्र, शहांचा आदेश?
कृषी कायदे मागे घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. कायदे चुकीचे होते म्हणून त्यांना माफी मागावी लागली. असे असेल तर मग या कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करताना मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा विचार सरकारने करायला नको का?, असा बोचरा सवालच राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला. आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांचा तपशील उपलब्ध नसल्याने मदत देता येणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी त्यात काहीही तथ्य नाही. पंजाबमध्ये आमचे सरकार आहे. आमच्या सरकारने ४०३ मृत शेकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत दिली आहे. कुटुंबातील एका सदस्याला आम्ही नोकरीही देत आहोत. एकूण ५०० मृतांची अधिकृत यादी आमच्याकडे आहे. त्याशिवाय आणखी २०० शेतकरी मृत पावले आहेत. या सर्वांना केंद्राकडूनही मदत मिळाली पाहिजे. हा डेटा मी सोमवारी संसदेत मांडणार आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवून यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीच राहुल यांनी केली. शेतकरी आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन मिनिटं मौनही संसदेत पाळलं गेलं नाही. त्यावरून या सरकारची मानसिकता कळून येते, असेही राहुल म्हणाले.
वाचा: कृषी कायदे रद्द करताना चर्चा का टाळली?; राहुल गांधी यांनी केला 'हा' गंभीर आरोप
सरकारला मदत द्यायची नसली की कारणे सांगितली जातात. करोनाने मृत पावलेल्यांना मदत देण्याची मागणी झाली तेव्हाही डेटा उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले. आता शेतकऱ्यांच्या बाबतीतही तेच उत्तर सरकार देत आहे. हेच सरकार त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींचा फायदा होत असेल तर मात्र कोणताच पुरावा मागत नाही. ते काम झटपट केले जाते, असा गंभीर आरोपही राहुल यांनी केला. मोदींकडे फक्त त्यांच्या उद्योगपती मित्रांचे नंबर आहेत तर आमच्याकडे सर्व शहीद शेतकऱ्यांची नावे आणि नंबर आहेत. जर पंतप्रधानांना माफी मागायचीच असेल तर त्यांनी या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. फोन करून त्यांना धीर द्यावा, मदतीचा हात द्यावा, असे आवाहन राहुल यांनी केले.
वाचा: 'त्या' ५ ड्रग्ज केस वर्ग करा; NCBचं महाराष्ट्राच्या DGना पत्र, शहांचा आदेश?